AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, सुख-दुखात साथ देणाऱ्या खासदाराने दिला राजीनामा

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे सध्या राजकारणात वाईट दिवस सुरु आहेत. स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हातातून जाताना दिसतोय. अनेक नेते, आमदार, खासदार तिथून पळ काढत आहेत. आता आणखी एका विश्वासू नेत्याने तृणमुलच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, सुख-दुखात साथ देणाऱ्या खासदाराने दिला राजीनामा
Mamata Banerjee
| Updated on: Jun 08, 2026 | 1:43 PM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अडचणी वाढत चालल्या आहेत. आधी पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांच्याविरोधात बंडाचा झेंडा फडकवला. आता ममता बॅनर्जी यांना दिल्लीत झटका बसला आहे. TMC चे राज्यसभा खासदार शुखेंदु शेखर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. खासदारकीसह पार्टीच्या सर्व पदांचा त्यांनी राजीनामा दिलाय. भ्रष्टाचाराविरुद्ध बोलल्यानंतर पक्षात मला वेगळं पाडण्यात आलं असा आरोप रॉय यांनी केला. शुखेंदु शेखर रॉय यांनी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी जाऊन राजीनामा सोपवला. इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल बोलले की, या आघाडीचं काहीही भविष्य नाही. तृणमुल काँग्रेसमध्ये असलेल्या भ्रष्टाचारामुळे मी राजीनामा देतोय असं ते म्हणाले.

मागच्या पाच वर्षात जो भ्रष्टाचार झालाय, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मी सरकारकडे मागणी करतो असं रॉय म्हणाले. पश्चिम बंगालमधील भाजपच्या पराभवाबद्दल ते म्हणाले की, “आरजी कारच्या मुद्यामुळे नाराजी होतीच. पण त्याशिवाय अन्य मुद्यांमुळेही जनतेच्या मनात संताप होता”

बातमी काय होती?

तृणमुलचे दोन खासदार राज्यसभेचा राजीनामा देऊ शकतात अशी बातमी होती, त्यात शुखेंदु शेखर यांचं नाव होतं. कोयल मलिक यांचं नाव सुद्धा समोर आलेलं. त्यांना याचवर्षी एप्रिल महिन्यात तृणमुलने राज्यसभेवर पाठवलं आहे. अजून पर्यंत कोयल मलिक यांच्या राजीनाम्याची बातमी आलेली नाही.

भाजपचं कौतुक सुद्धा केलं

शुखेंदु शेखर रॉय वर्ष 2011 मध्ये तृणमुल काँग्रेसमध्ये सहभागी झालेले. त्यानंतर ते ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय बनले. प्रत्येक सुख-दुखात ते पक्षासोबत राहिले. पण ममता बॅनर्जी यांचं सरकार पडल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीचे वाईट दिवस सुरु झाले. त्यांनी सुद्धा पक्ष सोडला. एवढच नाही, शुखेंदु शेखर रॉय यांनी भाजपचं कौतुक सुद्धा केलं. त्यावरुन असं वाटतय की ते लवकरच भाजपत दाखल होतील. तृणमुल काँग्रेसची सध्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेसारखी स्थिती झाली आहे.

Follow Us
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...