Pakistan Attack : पाकड्यांच्या ड्रोनचा हवेतच धूर निघाला; भारतीय लष्कराने Video पोस्ट केला, तुम्ही पाहिला का?

Operation Sindoor : भारतीय लष्कराने सीमा लगत काऊंटर ड्रोन ऑपरेशन सुरू केले. त्यामुळे पाकड्यांना थोबाड झोडून घ्यावे लागत आहे. त्यांचे 50 हून अधिक ड्रोन भारतीय लष्काराने नष्ट केले. 8-9 मे रोजी पाकिस्तानने अनेक ड्रोन डागले. तर क्षेपणास्त्र पण सोडले.

Pakistan Attack : पाकड्यांच्या ड्रोनचा हवेतच धूर निघाला; भारतीय लष्कराने Video पोस्ट केला, तुम्ही पाहिला का?
पाकड्यांचे ड्रोन हवतेच फूस
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 09, 2025 | 11:27 AM

भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेजवळ (Loc) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या प्रमाणात पाकड्यांनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले. पण पाकड्यांना तोंड झोडून घ्यावे लागले. कारण भारतीय लष्कराने सीमा लगत काऊंटर ड्रोन ऑपरेशन सुरू केले. पाकिस्तानचे 50 हून अधिक ड्रोन भारतीय लष्काराने नष्ट केले. 8-9 मे रोजी पाकिस्तानने अनेक ड्रोन डागले. तर क्षेपणास्त्र पण सोडले होते. ते हवेतच नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराच्या हवाईदलाने ताबडतोब उत्तर दिले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट सह अनेक क्षेत्रांमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. त्यानंतर आकाशात धूर दिसून आला.

भारतीय लष्कराचे अधिकृत माहिती

भारतीय लष्कराने या हल्ल्याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. त्यानुसार, पाकिस्तानी सशस्त्र सैन्यदलाने 8 आणि 9 मे रोजी मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांनी हल्ले करण्यात आले. पाक सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

शस्त्रसंधी उल्लंघन केल्यास सडेतोड उत्तर

पाकिस्तान लष्कराने भारतीय सीमा रेषेलगत ड्रोन हल्ले चढवले. हे हल्ले यशस्वीपणे भारताने परतवले. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कर, राष्ट्राची

उसने कहा, ‘ड्रोन हमलों को प्रभावी ढंग से विफल किया गया और संघर्ष विराम उल्लंघन को मुंहतोड़ जवाब दिया गया. भारतीय सेना देशाचे सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पाकिस्तानच्या सर्व षडयंत्रांना सडेतोड उत्तर देण्यात येईल, असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान बिथरलाय. भारताने पाकिस्तानची खिल्ली उडवल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान शाहबाज शरीफ याने अगोदरच दिली होती. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी स्थळ नेस्तनाबूत केल्याने पाकिस्तानचे लष्कर, सरकार पुरते हादरले आहे. दहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त झाल्याने पाकड्यांचा थयथयाट झाला आहे. त्यामुळे लष्कर प्रमुख मुनीर आणि पंतप्रधान शरीफ आता भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर पाकिस्तान अंतर्गत खंदक खणण्यात येत आहेत. अनेक शहरांभोवती तोफांचा गराडा घालण्यात आला आहे.

F-16 आणि JF-17 फायटर जेट पाडले

भारतीय एअर डिफेंस सिस्टिमने हे हल्ले यशस्वीपणे परतावून लावण्यात आले. पंजाबमधील भटिंडा येथे आज सकाळी ४ वाजता ड्रोन हल्ला केला. भारतीय लष्कराने हा हल्ला हाणून पाडला. इतकेच नाही तर पाकिस्तानचे तीन फायटर जेट पाडण्यात आले. यामध्ये JF17 आणि F16 या फायटर जेटचा त्यात समावेश होता. भारतीय एअर डिफेंस सिस्टम S-400 ने ड्रोन हल्ले हवेतच उडवून लावले.