AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Claim On India : पाकिस्तान होणार ‘इंडिया’! कोणी केला दावा

Pakistan Claim On India : मथळावाचून तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण दक्षिण आशियातील एका विश्वसनीय संस्थेने हे वृत्त दिल्यापासून खळबळ माजली आहे. केंद्र सरकारने भारत नाव अधिकृत केले तर केवळ भारतातच नाही तर जगभर त्याचे परिणाम दिसून येतील. काय केलाय या वृत्तात दावा?

Pakistan Claim On India : पाकिस्तान होणार 'इंडिया'! कोणी केला दावा
| Updated on: Sep 07, 2023 | 8:38 AM
Share

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : G-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताच्या राष्ट्रपतींचा उल्लेख President of India ऐवजी President of Bharat असा करण्यात आला. तेव्हापासून देशाचे अधिकृत नाव भारत करण्याच्या सरकार दरबारी हालचाली सुरु असल्याच्या चर्चांना जोर आला. अर्थात यावर विरोधकांपासून सर्वांनीच हल्लाबोल केला. या मुद्दावरुन राजकारण तापले आहे. डिबेट शोमध्ये दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडले आहेत. दरम्यान भारताच्या राज्यघटनेतच इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख असल्याने त्यासाठी केंद्र सरकारला (Central Government) विशेष काही वेगळं करण्याची गरज पडणार नाही, असा काही घटना तज्ज्ञांचा व्होरा आहे. भारत (Bharat) नावावरुन देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय मंचावर पण पडसाद उमटत आहेत. आता दक्षिण आशियातील एका संस्थेच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तान (Pakistan) इंडिया (India) या शब्दावर दावा सांगू शकतो, असा दावा या संस्थेने केला आहे, नेमकं काय आहे हे प्रकरण?

काय आहे दावा

पाकिस्तानच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जर इंडिया नावाऐवजी भारत या नावाला अधिकृत दर्जा मिळाला तर अनेक गोष्टी घडू शकतात. त्यानुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया नाव रद्दबातल ठरेल. त्याऐवजी भारत हे अधिकृत नाव समोर येईल. अशावेळी पाकिस्तान इंडिया नावावर दावा सांगू शकतो. पाकिस्तानचा इंडिया या शब्दासाठी अनेक दिवसांपासून खटाटोप सुरु आहे, हे अनेकांना माहिती नाही. त्यामागे एक ठोस कारण आहे. इंडिया हे नाव सिंधू संस्कृतीचे प्रतिक आहे. सध्याचा पाकिस्तानमध्येच हे क्षेत्र असल्याने सांस्कृतिक आधारावर ओळख दाखविण्यासाठी पाकिस्तान इंडिया नावावर दावा सांगणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

या अग्रगण्य संस्थेचा पण दावा

South Asia Index Report ही दक्षिण आशियातील अग्रगण्य संस्था आहे. त्यांनी ट्विटर-एक्स हँडलवर हा दावा केला आहे. त्यानुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया या शब्द रद्दबातल झाला आणि अधिकृतपणे भारत या नावावर शिक्कामोर्तब झाले तर पाकिस्तान इंडिया या शब्दावर दावा सांगू शकतो.

मोहम्मद अली जिना इंडिया नावावर आक्षेप

साऊथ आशिया इंडेक्सच्या दाव्यानुसार, भारताने इंडिया नावावर दावा सांगितल्यावर त्याला विरोध झाला होता. पाकिस्तानचे संस्थापक आणि तत्कालीन पंतप्रधान, कायदे आझम मोहम्मद अली जिना यांनी इंडिया नावाला विरोध केला होता. त्यांना इंडियावर हक्क सांगायचा होता. पण भारताने इंडिया नाव स्वीकारले होते. भारताने इंडिया ऐवजी हिंदुस्थान अथवा भारत हे नाव घ्यावे, असे त्यांनी सुचवले होते.

आमंत्रण पण नाकारले

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर एका प्रदर्शनीसाठी मोहम्मद अली जिना यांना आमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रण पत्रिकेवर इंडिया हा शब्द होता. त्यानाराजीने जिना यांनी प्रदर्शनीला भेट देण्यास नकार दिला. रागा रागात जिना यांनी भारताचे शेवटचे गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र लिहिले. त्यात इंडिया शब्दावरील भारताच्या दाव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा