AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने थकवले एक लाख कोटींचे कर्ज; दिल्ली हायकोर्ट म्हणते कर्जवसुलीची जबाबदारी केंद्राची

पाकिस्तानने थकवलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम 1 लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे, असा दावा याचिकाकर्ते ओम सहगल यांनी केला होता. त्यांनी याचिकेच्या समर्थनार्थ अनेक कागदपत्रे सादर केली होती. पाकिस्तानने स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर भारताकडून 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे याचिकेत म्हटले होते.

पाकिस्तानने थकवले एक लाख कोटींचे कर्ज; दिल्ली हायकोर्ट म्हणते कर्जवसुलीची जबाबदारी केंद्राची
ईडीलाही आरटीआय कायद्याच्या तरतुदी लागूImage Credit source: TV 9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 22, 2022 | 9:34 PM
Share

नवी दिल्ली : आर्थिक दारिद्र्य ओढवलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानचेही मोठ्या प्रमाणावर कर्ज (Debt) बुडवले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी हिंदुस्थानने पाकिस्तान (Pakistan)ला तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाला 70 वर्षे उलटून गेल्यानंतरही पाकिस्तानने हिंदुस्थानच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. स्वतःच आर्थिक विवंचनेत असलेला पाकिस्तान या कर्जाची परतफेड कशी करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने हे कर्ज पाकिस्तानकडून वसूल करण्याची जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची असल्याचे महत्त्वपूर्ण मत नोंदवले. याचवेळी या कर्जाकडे लक्ष वेधून कर्ज वसुलीची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (Pakistan pays off India’s Rs 1 lakh crore debt, The Delhi High Court held the debt recovery center responsible)

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाक फाळणीदरम्यान भारताने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना ही केंद्र सरकारची धोरणात्मक बाब असल्याचे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. पाकिस्तानकडून कर्ज वसुल करणे हे सरकारचे काम आहे आणि आम्ही याप्रकरणी कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असे खंडपीठाने यावेळी नमूद केले. केंद्र सरकार या प्रकरणी पावले उचलू शकते, परंतु आम्ही कोणत्याही प्रकारचे निर्देश देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते ओम सहगल यांनी याचिका दाखल केली होती.

भारत सरकारने फाळणीच्या वेळी पाकिस्तानला कर्ज दिले होते

फाळणीच्या वेळी भारत सरकारने पाकिस्तानला कर्ज दिले होते, परंतु पाकिस्तान भारत सरकारच्या पैशाचा वापर काश्मीर आणि भारतात इतरत्र हल्ले करण्यासाठी वारंवार करत आहे. या हल्ल्यांमध्ये भारताला असंख्य सैनिक गमवावे लागले आहेत. पाकिस्तानने थकवलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम 1 लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे, असा दावा याचिकाकर्ते ओम सहगल यांनी केला होता. त्यांनी याचिकेच्या समर्थनार्थ अनेक कागदपत्रे सादर केली होती. पाकिस्तानने स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर भारताकडून 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे याचिकेत म्हटले होते. (Pakistan pays off India’s Rs 1 lakh crore debt, The Delhi High Court held the debt recovery center responsible)

इतर बातम्या

Gadkari on Toll : 60 कि.मी. पर्यंत एकच टोल, गडकरींची घोषणा, अवैध टोल नाके तीन महिन्यात हटवणार, अवैध वसुलीचं काय?

Uttar Pradesh : 24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामे, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादवांचाही राजीनामा, काय आहे राजीनाम्यामागचं कारण?

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......