पाकिस्तानने थकवले एक लाख कोटींचे कर्ज; दिल्ली हायकोर्ट म्हणते कर्जवसुलीची जबाबदारी केंद्राची

पाकिस्तानने थकवलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम 1 लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे, असा दावा याचिकाकर्ते ओम सहगल यांनी केला होता. त्यांनी याचिकेच्या समर्थनार्थ अनेक कागदपत्रे सादर केली होती. पाकिस्तानने स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर भारताकडून 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे याचिकेत म्हटले होते.

पाकिस्तानने थकवले एक लाख कोटींचे कर्ज; दिल्ली हायकोर्ट म्हणते कर्जवसुलीची जबाबदारी केंद्राची
ईडीलाही आरटीआय कायद्याच्या तरतुदी लागूImage Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 9:34 PM

नवी दिल्ली : आर्थिक दारिद्र्य ओढवलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानचेही मोठ्या प्रमाणावर कर्ज (Debt) बुडवले आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी हिंदुस्थानने पाकिस्तान (Pakistan)ला तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाला 70 वर्षे उलटून गेल्यानंतरही पाकिस्तानने हिंदुस्थानच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. स्वतःच आर्थिक विवंचनेत असलेला पाकिस्तान या कर्जाची परतफेड कशी करणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने हे कर्ज पाकिस्तानकडून वसूल करण्याची जबाबदारी केंद्रातील मोदी सरकारची असल्याचे महत्त्वपूर्ण मत नोंदवले. याचवेळी या कर्जाकडे लक्ष वेधून कर्ज वसुलीची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (Pakistan pays off India’s Rs 1 lakh crore debt, The Delhi High Court held the debt recovery center responsible)

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाक फाळणीदरम्यान भारताने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना ही केंद्र सरकारची धोरणात्मक बाब असल्याचे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. पाकिस्तानकडून कर्ज वसुल करणे हे सरकारचे काम आहे आणि आम्ही याप्रकरणी कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असे खंडपीठाने यावेळी नमूद केले. केंद्र सरकार या प्रकरणी पावले उचलू शकते, परंतु आम्ही कोणत्याही प्रकारचे निर्देश देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात याचिकाकर्ते ओम सहगल यांनी याचिका दाखल केली होती.

भारत सरकारने फाळणीच्या वेळी पाकिस्तानला कर्ज दिले होते

फाळणीच्या वेळी भारत सरकारने पाकिस्तानला कर्ज दिले होते, परंतु पाकिस्तान भारत सरकारच्या पैशाचा वापर काश्मीर आणि भारतात इतरत्र हल्ले करण्यासाठी वारंवार करत आहे. या हल्ल्यांमध्ये भारताला असंख्य सैनिक गमवावे लागले आहेत. पाकिस्तानने थकवलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम 1 लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहे, असा दावा याचिकाकर्ते ओम सहगल यांनी केला होता. त्यांनी याचिकेच्या समर्थनार्थ अनेक कागदपत्रे सादर केली होती. पाकिस्तानने स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर भारताकडून 300 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, असे याचिकेत म्हटले होते. (Pakistan pays off India’s Rs 1 lakh crore debt, The Delhi High Court held the debt recovery center responsible)

इतर बातम्या

Gadkari on Toll : 60 कि.मी. पर्यंत एकच टोल, गडकरींची घोषणा, अवैध टोल नाके तीन महिन्यात हटवणार, अवैध वसुलीचं काय?

Uttar Pradesh : 24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामे, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादवांचाही राजीनामा, काय आहे राजीनाम्यामागचं कारण?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.