AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh : 24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामे, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादवांचाही राजीनामा, काय आहे राजीनाम्यामागचं कारण?

उत्तर प्रदेशात येत्या 25 मार्चला योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. उत्तर प्रदेशवर योगी आदित्यनाथ यांची सलग दुसऱ्यांदा सत्ता आल्याने या शपथविधी सोहळ्याकडे देशभराचं लक्ष लागून आहे. मात्र, या पूर्वी 24 घंट्यामध्ये उत्तर प्रदेशातील तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमध्ये सर्वात मोठे नाव योगी आदित्यनाथ यांचे आहे. तर दुसरा राजीनामा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि तिसरा राजीनामा आजम खान यांचा आहे.

Uttar Pradesh : 24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामे, योगी आदित्यनाथ, अखिलेश यादवांचाही राजीनामा, काय आहे राजीनाम्यामागचं कारण?
24 तासांत तीन बड्या नेत्यांचे राजीनामेImage Credit source: social
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Mar 22, 2022 | 5:17 PM
Share

दिल्ली : उत्तर प्रदेशात येत्या 25 मार्चला योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. उत्तर प्रदेशवर योगी आदित्यनाथ यांची सलग दुसऱ्यांदा सत्ता आल्याने या शपथविधी सोहळ्याकडे देशभराचं लक्ष लागून आहे. मात्र, या पूर्वी सोमवारपासून ते मंगळवारपर्यंतच्या 24 घंट्यामध्ये उत्तर प्रदेशातील तीन बड्या नेत्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमध्ये सर्वात मोठे नाव योगी आदित्यनाथ यांचे आहे. तर दुसरा राजीनामा समाजवादी पक्षाचे (Samajvadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि तिसरा राजीनामा आजम खान यांचा आहे. योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव आणि आजम खान यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील या तिन्ही बड्या नेत्यांच्या राजीनाम्यांची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. या तिन्ही बड्या नेत्यांनी का राजीनामा दिला. यामागचे काय कारण आहे. जाणून घेऊया.

योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा

उत्तर प्रदेशचे काळजीवाहून मुख्यमंत्री योगी आत्यनाथ यांनी सोमवारी रात्री विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, 2017 विधानसभा निवडणुकीनंतर योगी आदित्यनाथ यांना विधिमंडळ पक्षा नेता म्हणून निवडण्यात आलं होतं. त्यावेळी ते गोरखपुरचे खासदार होते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते विधानपरिषदेचे बिनविरोध सदस्य म्हणून निवडणून आले. त्यांनी विधान परिषदेच्या कार्यकाळातच मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दुसऱ्यांना योगी आदित्यनाथ यांना निवडणूक लढवण्याचं ठरवलं. त्यावेळी योगी यांनी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी योगी आदित्यनात यांनी समाजवादी पक्षाच्या सुभावती शुक्ला यांना 1 लाख पेक्षा अधिक मतांनी पराभूत केलाय. आता योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अखिलेश यादव यांचा राजीनामा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यावेळी विधानसभा निवडणूक करहल विधानसभा मतदारसंघातून लढवली. त्यांना या जागेवरुन भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी बघेल यांना पराभूत केलं. अखिलेश यादव आझमगडमधून खासदार होते. आता लोकसभेत समाजवादी पक्षाच्या पाच जागा आहेत. यातच असं मानलं जात होतं की अखिलेश यादव हे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील. पण त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जाणकारांच्या मते अखिलेश यादव हे 2027 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करतायेत. यात ते आमदार राहून राज्यातील राजकारणावर फोकस करत आहेत.

आजम खान यांचा राजीनामा

समाजवादी पक्षाचे नेता अखिलेश यादव यांच्यासोबत आजम खान यांनी देखील लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावेळी आजम खान हे रामपूर विधानसभेच्या जागेवरुन लढले होते. रामपूर विधानसभेतून ते जिंकलेही. आता आजम खान यांनी देखील अखिलेश यादव यांच्याप्रमाणे राज्यातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता अखिलेश यादव आणि आजम खान यांच्या राजीनाम्यानंतर लोकसभेतील दोन जागा खाली झाल्या आहेत. यातच या दोन्ही जागेवर निवडणुका होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

2024 ला मावळमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा Parth Pawar? रोहित पवारांचं सूचक वक्तव्य; तर संजय राऊत म्हणतात…

तर तो माझा शेवटचा क्षण असेल, धनंजय मुंडेंच्या आरोपांवर pankaja munde यांचा पलटवार

Satara : देगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, महिलेनं आयोजित केली स्पर्धा

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?