Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या…नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!

नारी शक्ती अधिनयमात दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर होऊ न शकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. महिला हे कधीच विसरणार नाहीत, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi Live : महिला सगळं विसरतात पण त्या...नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, लाईव्ह येत सडकून टीका!
narendra modi live speech
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2026 | 8:58 PM

Nari Shakti Bill : लोकसभेत बहुमताचा आकडा न गाठता आल्याने गेल्या मोदी सरकारने आणलेले नारी शक्ती वंदन अधिनियम दुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकाच्या माध्यमातून मोदी सरकार आपला राजकीय स्वार्थ साधत असल्याचा आरोप करत विरोधकांनी एकजूट होऊन या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. दक्षिणेतील सर्व पक्षांनी एकत्र येत या विधेयकाल विरोध केला. हे विधेयक फेटाळले जाणे म्हणजे मोदी सरकारला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येत देशाशी संवाद साधला. देशातील महिला आता विरोधकांना कधीच माफ करणार नाहीत, असे मोदी म्हणाले. तसेच काँग्रेस हा पक्ष सुधारणांना विरोध करणारा पक्ष आहे, असा हल्लाबोल केला.

काही लोकांसाठी पक्षहीत हेच सर्वस्व

श म्ही खूप प्रयत्न केला, तरी आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही. नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही. त्यासाठी मी सर्वा माता-भगिनींची माफी मागतो. आमच्यासाठी देशहीत सर्वोच्च आहे. परंतु काही लोकांसाठी पक्षहीत हेच सर्वस्व आहे. पक्षहीत हे देशहितापेक्षा मोठे असेल तर नारी शक्ती, देशाला याचे नुकसान सहन करावे लागते. यावेळीदेखील असेच झाले. काँग्रेस, डीएमके, टीएमसी, समाजवादी तसेच अन्य पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांना नुकसान सोसावे लागत आहे, असे मोदी म्हणाले.

महिला सगळं विसरतात पण त्या कधीच….

काल देशातील करोडो महिलांची नजर संसदेवर होती. देशातील महिला पाहात होत्या. मलाही खूप दु:ख झाले. महिलांच्या हितासाठीचा हा प्रस्ताव मंजूर न झाल्यानंतर काँग्रेस, डीएमके, टीएमके, सपा यासारखे पक्ष आनंदाने टाळ्या वाजवत होते. महिलाकडून त्यांचे अधिकार हिसकावून घेऊन विरोधकांनी टाळ्या  वाजवल्या. या पक्षांनी जे केले ते महिलांच्या सन्मानावर आघात आहे. महिला सगळं विसरतात परंतु त्यांचा अपमान कधीच विसरत नाहीत. म्हणूनच काँग्रेस तसेच इतर पक्षांची भूमिका प्रत्येक महिलेच्या मनात कायम राहणार आहे. देशातील महिला जेव्हा-जेव्हा या नेत्यांना पाहतील तेव्हा-तेव्हा महिलांना या पक्षांची भूमिका आठवेल, असे म्हणत मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

Follow Us