AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने कोरोनाला कसं हरवलं? ‘दावोस अजेंडा’मधील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'दाओस अजेंडा' संमेलनात संबोधित केलं (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

भारताने कोरोनाला कसं हरवलं? 'दावोस अजेंडा'मधील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 28, 2021 | 6:34 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘दाओस अजेंडा’ संमेलनात संबोधित केलं. या कार्यक्रमात जगभरातील उद्योग जगतातील 400 संस्था सहभागी झाल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या भयानक संकट काळात अर्थव्यवस्थेला भारताने कसं जीवंत ठेवलं, याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर भारताने कोरोना संकटावर कशी मात केली, याबाबत त्यांनी भाष्य केलं (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

“मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने जगाला विश्वास आणि सकारात्मकता आणि आशांचा संदेश घेऊन आलो आहे. जेव्हा कोरोना आला तेव्हा भारतासमोरही अनेक आव्हानं होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात जगभरातील अनेक नामांकित संस्थांनी बरेच काही दावे केले होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

“जगभरातील तज्ज्ञांनी कोरोनाचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल, असा दावा केला होता. भारतात कोरोना संसर्गाची त्सुनामी येणार, कुणी 70 कोटी ते 80 कोटी लोकांना कोरोना संसर्ग होणार असल्याचा दावा केला तर कुणी 2 कोटी पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी आमची काय मनस्थिती असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. पण भारत नैराशाच्या बळी गेला नाही. भारत लढत राहिला”, असं मोदी म्हणाले.

“आम्ही कोव्हिड स्पेसिफीक हेल्थ इन्फ्र्रास्ट्र्क्चर डेव्हलप करण्यावर भर दिला. अनेकांना ट्रेन केलं. टेस्टिंग आणि ट्रेकिंगवर भर दिला. या कालावधीत भारताच्या प्रत्येक व्यक्तीने धैर्याने आपल्या कर्तव्याचं पालन केलं. कोरोना विरोधातील लढाईला एक जनआंदोलनात बदललं. आज भारत जगभरातील त्या देशांमध्ये आहे जे देश आपल्या सर्वाधिक नागरिकांना वाचवण्यात यशस्वी ठरले”, असा दावा मोदी यांनी केला.

“भारतात आज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत आहे. भारताच्या यशाची तुलना कोणत्या देशाशी करणं योग्य राहणार नाही. सुरुवातीच्या काळात पीपीई किट, मास्क सारख्या इतर वस्तू आम्ही बाहेरुन मागवत होतो. मात्र आज या सर्व वस्तूंच उत्पादन करुन इतर देशांची सेवा करत आहोत. आज भारतात लसीकरण सुरु आहे. सुरुवातीच्या फक्त 12 दिवसांमध्ये 2.3 मिलियन पेक्षा जास्त हेल्थ वर्कसला लस देण्यात आली आहे”, असं मोदींनी सांगितलं.

“भारताने आपल्या वैश्विक जबाबदारीला निभावलं आहे. भारताने 150 पेक्षा जास्त देशांना औषधं दिली. आज भारत इतर देशांमध्ये कोरोना लस पाठवून लोकांचे प्राण वाचवत आहे. आतापर्यंत दोन लसी आल्या आहेत. मात्र आगामी काळात आणखी काही लसी भारतातून येणार आहेत”, असंदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

संबंधित बातमी : भारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!