AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने कोरोनाला कसं हरवलं? ‘दावोस अजेंडा’मधील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'दाओस अजेंडा' संमेलनात संबोधित केलं (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

भारताने कोरोनाला कसं हरवलं? 'दावोस अजेंडा'मधील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Updated on: Jan 28, 2021 | 6:34 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘दाओस अजेंडा’ संमेलनात संबोधित केलं. या कार्यक्रमात जगभरातील उद्योग जगतातील 400 संस्था सहभागी झाल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या भयानक संकट काळात अर्थव्यवस्थेला भारताने कसं जीवंत ठेवलं, याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर भारताने कोरोना संकटावर कशी मात केली, याबाबत त्यांनी भाष्य केलं (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

“मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने जगाला विश्वास आणि सकारात्मकता आणि आशांचा संदेश घेऊन आलो आहे. जेव्हा कोरोना आला तेव्हा भारतासमोरही अनेक आव्हानं होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात जगभरातील अनेक नामांकित संस्थांनी बरेच काही दावे केले होते”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले (PM Narendra Modi speech in Davos agenda summit 2021).

“जगभरातील तज्ज्ञांनी कोरोनाचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल, असा दावा केला होता. भारतात कोरोना संसर्गाची त्सुनामी येणार, कुणी 70 कोटी ते 80 कोटी लोकांना कोरोना संसर्ग होणार असल्याचा दावा केला तर कुणी 2 कोटी पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळी आमची काय मनस्थिती असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. पण भारत नैराशाच्या बळी गेला नाही. भारत लढत राहिला”, असं मोदी म्हणाले.

“आम्ही कोव्हिड स्पेसिफीक हेल्थ इन्फ्र्रास्ट्र्क्चर डेव्हलप करण्यावर भर दिला. अनेकांना ट्रेन केलं. टेस्टिंग आणि ट्रेकिंगवर भर दिला. या कालावधीत भारताच्या प्रत्येक व्यक्तीने धैर्याने आपल्या कर्तव्याचं पालन केलं. कोरोना विरोधातील लढाईला एक जनआंदोलनात बदललं. आज भारत जगभरातील त्या देशांमध्ये आहे जे देश आपल्या सर्वाधिक नागरिकांना वाचवण्यात यशस्वी ठरले”, असा दावा मोदी यांनी केला.

“भारतात आज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने घटत आहे. भारताच्या यशाची तुलना कोणत्या देशाशी करणं योग्य राहणार नाही. सुरुवातीच्या काळात पीपीई किट, मास्क सारख्या इतर वस्तू आम्ही बाहेरुन मागवत होतो. मात्र आज या सर्व वस्तूंच उत्पादन करुन इतर देशांची सेवा करत आहोत. आज भारतात लसीकरण सुरु आहे. सुरुवातीच्या फक्त 12 दिवसांमध्ये 2.3 मिलियन पेक्षा जास्त हेल्थ वर्कसला लस देण्यात आली आहे”, असं मोदींनी सांगितलं.

“भारताने आपल्या वैश्विक जबाबदारीला निभावलं आहे. भारताने 150 पेक्षा जास्त देशांना औषधं दिली. आज भारत इतर देशांमध्ये कोरोना लस पाठवून लोकांचे प्राण वाचवत आहे. आतापर्यंत दोन लसी आल्या आहेत. मात्र आगामी काळात आणखी काही लसी भारतातून येणार आहेत”, असंदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

संबंधित बातमी : भारत पुन्हा पूर्वपदावर येणार, देशाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, सक्रिय रुग्णांची संख्या पावणे दोन लाखावर

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.