AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Security Breach: सुरक्षेत त्रुटी, पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार?; राष्ट्रपतींकडून मोठी कारवाई होणार?

पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहून गेली. त्यामुळे मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले.

PM Security Breach: सुरक्षेत त्रुटी, पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार?; राष्ट्रपतींकडून मोठी कारवाई होणार?
pm narendra modi
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 1:17 PM
Share

नवी दिल्ली: पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहून गेली. त्यामुळे मोदींना आपला दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. या प्रकारावर त्यांनी संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे. त्यानंतर मोदी आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना झाल्या प्रकाराची माहिती देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून कालच्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली होती. आता मोदी थेट राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतीचीची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकार सांगणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रपती राजवट लागू करा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहणे ही गंभीर चूक असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यपालांकडून अहवाल मागवणार?

दरम्यान, पंतप्रधानांच्या भेटीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंजाबच्या राज्यपालांकडून घटनेचा अहवाल मागून घेण्याची शक्यता आहे. राज्यपालांचा अहवाल आल्यानंतरच ते पुढील निर्णय घेतील, असंही सूत्रांनी सांगितलं.

नेमकं काल काय घडलं?

काल मोदी पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर पंजाब सरकारने एसएसपीला निलंबित केलं होतं.

संबंधित बातम्या:

PM Security Breach: पंजाबचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांना निलंबित करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका

PM Security Breach: पंजाब पोलिसांकडून गुप्तचर विभागाच्या माहितीकडे दुर्लक्ष, ब्ल्यू बुक नियमांकडे कानाडोळा; केंद्रीय गृहमंत्रालयाने ठेवलं बोट

सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या नुकसानीची मिळेल का भरपाई, शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे..!

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.