AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Security | चौकशीसाठी SIT स्थापणार का, केंद्र-पंजाब सरकार सुप्रीम कोर्टात काय बाजू मांडणार?

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चूक प्रकरणी चौकशी करायला तूर्तास तरी मनाई केली आहे. सोबतच पंजाब आणि हरियाणा कोर्टाने पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासंबंधीच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधीच्या नोंदी पंजाब सरकारडून तात्काळ घ्याव्यात असे आदेश दिलेत.

PM Security | चौकशीसाठी SIT स्थापणार का, केंद्र-पंजाब सरकार सुप्रीम कोर्टात काय बाजू मांडणार?
पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात फैसल्याची शक्यता
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Jan 10, 2022 | 10:41 AM
Share

नवी दिल्लीः पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) थोड्याच वेळात सुनावणी सुरू होणार आहे. मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि हेमा कोहली यांच्या पीठासमोर या प्रकरणावर वाद-विवाद होणार असून, ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाच्या देखरेखेखाली या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केलीय.

आज काय होणार?

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारला पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चूक प्रकरणी चौकशी करायला तूर्तास तरी मनाई केली आहे. सोबतच पंजाब आणि हरियाणा कोर्टाने पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधीच्या नोंदी, अहवाल पंजाब सरकारडून तात्काळ घ्याव्यात असे आदेश दिलेत. हा सारा अहवाल उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी सीलबंद लिफाफ्यात आज सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करावे, असे सांगितले आहे. याप्रकरणी केंद्र सरकार आणि पंजाब सरकार आज सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत. आजच्या सुनावणीत अनेक मुद्दे उपस्थित  होण्याची शक्यता आहे. या प्रमुख मुद्यांवर एक नजर…

या मुद्द्यावर चर्चा होईल?

1) पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल सर्व साक्षी आणि संबंधित दस्ताऐवज घेतल्याचे सांगतील. ते सादर करतील किंवा काही वेळ मागतील.

2) एनआयएच्या कोणाला नोडल अधिकारी म्हणून आपण नियुक्त केले आहे आणि ते कसे मदत करतील हे केंद्र सरकार सांगेल.

3) पंतप्रधनांच्या सुरक्षेसंबंधी इतर एजन्सींच्या मदतीबाबतही केंद्र सरकार माहिती देऊ शकेल.

4) याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली एका विशेष चौकशी समिती म्हणजे SIT ची स्थापना करावी, अशी मागणी होऊ शकते. यात विशेष एजन्सींच्या अधिकाऱ्यांना सहभागी केले जाऊ शकते.

5) पंजाब सरकार चौकशीमध्ये राज्याच्या अधिकाऱ्यांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करू शकते.

6) सर्वोच्च न्यायालय चौकशी संबंधित पैलूचे मुद्दे निश्चित करू शकते.

7) पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार आणि केंद्राकडून उत्तर मागितले जावू शकते.

8) माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत यापूर्वी अशा काही चुका झाल्यात का, हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यानंतर उचलेली पावले किती उपयोगी पडली, यावरही विचार केला जावू शकतो.

9) सर्वोच्च न्यायालय सर्वांचा पक्ष ऐकूण घेतल्यानंतर आपला निकाल राखून ठेवू शकते.

10) केंद्र आणि पंजाब सरकारला या प्रकरणाची चौकशी थांबवावी, असे आदेश लिखित स्वरूपात दिले जावू शकतात.

इतर बातम्याः

IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल

U19 World Cup: 11 षटकार, 20 चौकार आणि 278 धावा… वॉर्मअप मॅचमध्ये भारताच्या युवा संघाने दाखवला पराक्रम

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली