AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल

या कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर BCCI वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. बीसीसीआयने प्लान B बनवला आहे.

IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 9:48 AM
Share

मुंबई: सध्या संपूर्ण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. या रुग्णवाढीमुळे IPL च्या आयोजनाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात कोरोना रुग्णवाढ होत असताना, मुंबई-महाराष्ट्रात वेगळी परिस्थिती नाहीय. या कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर BCCI वेगवेगळ्या पर्यायांवर विचार करत आहे. बीसीसीआयने प्लान B बनवला आहे. या प्लाननुसार IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. मुंबईचं वानखेडे स्टेडियम, त्याच्या जवळच असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मुंबईतील डी.वाय.पाटील आणि पुणे गहुजे येथे असलेलं महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम या चार मैदानांवर संपूर्ण IPL चा सीजन खेळवण्याचा BCCI चा विचार आहे. (IPL 2022 Cricket Board looking to stage the entire IPL in Maharashtra)

शरद पवारांची घेतली भेट या संदर्भात पाच जानेवारीला बीसीसीआयचे अंतरीम CEO व आयपीएलचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर हेमांग अमीन यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांची भेट घेतली. काही दिवसांनी अमीन आणि पाटील यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बीसीसीआयच्या प्रस्तावाला शरद पवारांनी हिरवा कंदिल दाखवल्याची माहिती आहे. या आठवड्यात किंवा पुढच्या दहा दिवसात बीसीसीआय आणि एमसीएचे अधिकारी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्स सचिव सीताराम कुंटे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आवश्यक परवानग्या मिळवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल.

कुठलीही हलगर्जी करणार नाही कोविड बाबत कुठलीही हलगर्जी केली जाणार नाही. कठोर बायोबबल नियमांचे पालन करु स्पर्धा खेळवली जाईल. प्रेक्षकांना मैदानावर परवानगी नसेल. खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अधिकाऱ्यांची वेळोवेळी चाचणी केली जाईल. विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

शनिवारी महाराष्ट्रात 40,925 तर मुंबईत 20,971 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी महाराष्ट्र सरकारने नव्या निर्बंधाबाबत आदेश जारी करताना काही नियमांचे कठोर पालन होणार असेल, तर क्रीडा स्पर्धांना परवानगी दिली आहे.

रणजी स्पर्धा पुढे ढकलली यंदाच्या आयपीएल हंगामासाठी अजून मेगा ऑक्शन पार पडायचं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा देशातच आयोजित करण्याचा बीसीसीआय गांभीर्याने विचार करतेय. बीसीसीआयने सध्याची कोविड स्थिती लक्षात घेऊन रणजी करंडकासह काही महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. सध्या बीसीसीआयकडे महाराष्ट्राचा पर्याय आहे, पण इथे सुद्धा स्पर्धा आयोजित करणं शक्य झालं नाही, तर मग स्पर्धा परदेशात खेळवली जाईल असे सूत्राने सांगितले.

संबंधित बातम्या: IND vs SA: सिराजमुळे टीम मॅनेजमेंटसमोर सिलेक्शनचा पेच, द्रविड-कोहली कोणावर विश्वास दाखवणार? मित्र धोनीसाठी धावून गेला जाडेजा, KKR ची बोलती केली बंद, IPL आरंभाआधीच सुरु झाली ठसन Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीआधी जसप्रीत बुमराह झाला भावूक, दिला खास संदेश

Follow Us
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन