
संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज आज मुद्द्यांवर भाष्य करत सरकार गंभीर ओरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की ‘न्याय विभागाकडे एपस्टाईन फाइल्सवरील फाइल्स आहेत, ज्यामध्ये मंत्री हरदीप पुरी आणि अनिल अंबानी यांची नावे आहेत. अदानी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात समन्स जारी करण्यात आले आहेत. मात्र गेल्या 18 महिन्यांपासून भारत सरकारने याला प्रतिसाद दिलेला नाही. याचा अर्थ पंतप्रधानांवर थेट दबाव आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींच्या भाषणावर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, ‘जर कोणताही आरोप केला गेला तर तो संबंधित कागदपत्रांसह त्याचे पुरावे दिले पाहिजेत. त्यांना नियम किंवा ऑथंटिकेशनचा अर्थ कळत नाही. म्हणूनच ते काहीही बोलत राहतात. काँग्रेसला इतिहासाचे ज्ञान नाही. त्यांनी अर्थसंकल्पाबद्दल काहीही सांगितले नाही. जेव्हा एखादा सदस्य अध्यक्षपदावर बसतो तेव्हा तो कोणत्याही पक्षाचा नसतो. तो पूर्वी त्यांच्या पक्षात होता असे सांगून अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान करून ते विरोधी पक्षनेत्याच्या पदाला कमी लेखत आहेत. फक्त राजकीय फायद्यासाठी, त्यांनी अर्थसंकल्प वगळता सर्व गोष्टींवर भाष्य केले.’
#WATCH | Delhi | On LoP Rahul Gandhi’s speech in Lok Sabha during debate on Union Budget, Union Minister Pralhad Joshi says,” If an allegation is made, it has to be authenticated with related documents. He has no understanding of either the rules or the meaning of authentication.… pic.twitter.com/JMnOS6rZeV
— ANI (@ANI) February 11, 2026
लोकसभेतील भाषणात राहुल गांधींनी सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यावर बोलताना केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल आणि निराधार विधाने केल्याबद्दल आम्ही राहुल गांधींविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव मांडणार आहोत. लोकसभा आणि राज्यसभेचे कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम अतिशय स्पष्ट आहेत. जेव्हा एखादा सदस्य दुसऱ्या सदस्यावर गंभीर आरोप करू इच्छितो तेव्हा त्यांनी सूचना देऊन ठोस प्रस्ताव मांडला पाहिजे. सभागृहात, मी राहुल गांधींना त्यांच्या बोलण्याबद्दल आवश्यक कागदपत्रे देण्याची विनंती केली.”