AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coromandel Express Accident : काँग्रेसच्या काळातही रेल्वे अपघात झाला होता पण…-राहुल गांधी

Rahul Gandhi on Odisha Train Accident 2023 : ओडिसातील रेल्वे अपघातावर राहुल गांधी यांचं भाष्य; मोदी सरकारवर निशाणा, दिला जुन्या अपघाताचा दाखला

Coromandel Express Accident : काँग्रेसच्या काळातही रेल्वे अपघात झाला होता पण...-राहुल गांधी
| Updated on: Jun 05, 2023 | 8:45 AM
Share

Rahul Gandhi US Tour : ओडिसामध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातामुळे अवघा देश हळहळला आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. न्यूयॉर्कमधील भारतीय लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी या अपघातावर भाष्य केलंय. तसंच काँग्रेसच्या काळातील अपघाताचा दाखला देत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

मला आठवतंय काँग्रेसच्या काळातही असाच रेल्वे अपघात झाला होता. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी असं नाही म्हटलं की हा अपघात इंग्रजांमुळे झाला…. उलट त्यांनी म्हटलं की मी या अपघाताची मी जबाबदारी घेतो अन् राजीनामा देतो. पण आता तसं घडताना दिसत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

भाजप कोणत्याही गोष्टीचा संदर्भ इतिहासाशी जोडतं. या अपघाताबद्दल जरी विचारलं तरी ते इतिहासाशी त्याचा संबंध जोडतील. भाजपला विचारलं की हा ओडिसातील रेल्वे अपघात कसा झाला तर ते म्हणतील, की काँग्रेसने मागच्या 50 वर्षात काय केलं?, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात

ओडीसातील बालासोरजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात झाला. अप लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला कोरोमंडल एक्स्प्रेसने धडक दिेली. त्यानंतर रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या पटरीवर आदळले. तिथून जाणाऱ्या बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसलाही यामुळे अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत. तिथे बोलताना ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांनी नथूराम गोडसेचा देखील दाखला दिला. देशात सध्या एक महात्मा गांधी यांची विचारधारा आणि दुसरी नथूराम गोडेसची विचारधारांमध्ये संघर्ष सुरू आहे, असं राहुल गांधी म्हणालेत.

राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर हे लोक देशात द्वेष परसवत आहेत. यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ असणाऱ्या संस्थांवरही कब्जा केला आहे, असं राहुल गांधी म्हणालेत.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.