AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं काय झालं की राहुल गांधी यांनी स्वत:लाच चाबकाचे फटके मारून घेतले; भारत जोडो यात्रेत चाललंय काय?

भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात आहे. राज्यातील 19 विधानसभा मतदारसंघ आणि 7 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे.

असं काय झालं की राहुल गांधी यांनी स्वत:लाच चाबकाचे फटके मारून घेतले; भारत जोडो यात्रेत चाललंय काय?
असं काय झालं की राहुल गांधी यांनी स्वत:लाच चाबकाचे फटके मारून घेतले; भारत जोडो यात्रेत चाललंय काय? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2022 | 2:27 PM
Share

हैदराबाद: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सुरू आहे. ही यात्रा हैदराबादेत पोहोचली आहे. सध्या या यात्रेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी स्वत:ला चाबकाचे फटके मारताना दिसत आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तेलंगणात सध्या बोनालू हा पारंपारिक उत्सव सुरू आहे. या उत्सवात सहभागी होऊन राहुल गांधी यांनी स्वत:वर आसूडाचे फटके (Whips) मारले. त्याचाच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा 57 वा दिवस आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा तेलंगणात आली. राज्यात सध्या बोनालू उत्सव सुरू आहे. इथे आल्यावर राहुल गांधी यांनी पोतराजांची भेट घेतली. हे पोतराज अंगावर आसूडाने फटके मारत होते.

राहुल गांधी यांनीही पोतराजांकडून आसूड घेतला आणि अंगावर सपासप फटके मारण्यास सुरुवात केली. हजारो लोकांसमोर त्यांनी अंगावर चाबकाचे फटके मारले. सर्वसामान्यांमध्ये मिसळलेल्या राहुल गांधी यांचं हे कृत्य पाहून येथे उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी जोरदार जल्लोष केला.

बोनालू उत्सवात हे पोतराज भाग घेत असतात. ते या उत्सवाचं प्रमुख आकर्षण असतात. या पोतराजांना देवी महाकालीचा भाऊ मानलं जातं. ते देवीच्या रक्षणासाठी हातात आसूड घेऊन फिरतात.

या उत्सवात पोतराज बनलेले युवक पुढे पुढे चालतात. त्यांच्यामागे महिला येत असतात. अशा प्रकारे हे लोक पायी चालत देवीच्या मंदिरात येतात. ही पायी पदयात्रा करताना हे पोतराज अंगावर कोडे मारत मारतच देवीच्या मंदिरापर्यंत येत असतात. ही गेल्या अनेक वर्षांपासूनची इथली परंपरा आहे.

भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणात आहे. राज्यातील 19 विधानसभा मतदारसंघ आणि 7 लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही यात्रा सुरू असून त्यांनी आतापर्यंत 375 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात झाली. काश्मीरला या यात्रेचा शेवट होणार आहे. एकूण 3570 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा काश्मीरला पोहोचणार आहे.

Follow Us
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.