AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे कनेक्टिविटी वाढणार, जी किशन रेड्डी यांच्याकडून 4 नव्या गाड्यांना हिरवा झेंडा

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टीने, केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयाने आणखी 4 गाड्यांच्या विस्तारास मान्यता दिली आहे. सोमवारी केंद्रीय मंत्र्यांनी या चार नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला,

रेल्वे कनेक्टिविटी वाढणार, जी किशन रेड्डी यांच्याकडून 4 नव्या गाड्यांना हिरवा झेंडा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 09, 2023 | 10:33 AM
Share

नवी दिल्ली : तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी भारत सरकारने आणखी एक पाऊल उचलले आहे. अनेक हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात राबवले जातील. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तेलगू राज्यांमध्ये नवीन रेल्वे मार्ग, दुहेरीकरण, तिप्पट आणि विद्युतीकरण यासारख्या भांडवली खर्चाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी रेल्वे मंत्रालय कोणतीही कसर सोडत नाही. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयाने आणखी 4 गाड्यांच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी सोमवारी सिकंदराबाद स्थानकावरून काझीपेठ ते हडपसर (पुणे), कुर्नूल-जयपूर, बोधन-करीमनगर, रायचूर-नांदेड या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

सोमवारी सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वरून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. भारतीय रेल्वेने तेलंगणा राज्यातून जाणाऱ्या विविध गाड्यांच्या गंतव्यस्थानांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून संबंधित प्रदेशातून धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवून प्रवाशांसाठी रेल्वे सेवा अधिक सुलभ व्हावी.

प्रवाशांना अतिरिक्त सुविधा मिळणार

रेल्वे सेवेमुळे तेलंगणातील लोकांना प्रवासाची अतिरिक्त सुविधा मिळेल आणि सर्वात दूरच्या स्थळांसाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होईल. काझीपेठच्या लोकांना पुण्यापर्यंत जाण्यासाठी थेट आणि सोयीस्कर रात्रीच्या प्रवासाची सुविधा मिळेल. शादनगर, महबूबनगर, गडवाल आणि कर्नूल शहरांतील लोकांना जयपूर दिशेकडे थेट आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे कर्नाटकातील सेदाम, चित्तापूर, यादगीर आणि रायचूर येथील लोकांना आता या विस्तारित रेल्वे सेवेमुळे नांदेडच्या दिशेने प्रवास करता येणार आहे. बोधनातील लोकांना आता करीमनगर आणि मागे जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा दिली जाणार आहे. करीमनगर-निजामाबाद-बोधन पॅसेंजर स्पेशल दिवसा धावेल आणि दुसऱ्या सामान्य श्रेणीचे डबे असतील.

Follow Us
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी