AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गहलोतांच्या माफीने निष्ठा आणखी गडद झाली…

अशोक गहलोत यांनी रविवारी जयपूरमध्ये जे राजकीय नाट्य घडले आहे, त्याची त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे.

गहलोतांच्या माफीने निष्ठा आणखी गडद झाली...
| Updated on: Sep 29, 2022 | 5:50 PM
Share

नवी दिल्लीः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांनी दिल्लीतील 10 जनपथवर आपण काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाहेर जात असल्याचे जाहीर करताच काँग्रेसमधील त्यांचे निष्ठावान नेत्यांमध्ये शांतता पसरली. गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election 2022) लढवणार नसल्याचे जाहीर करत सोनिया गांधींची त्यांनी लेखी माफीही मागितली. त्यामुळे एका अर्थाने राजस्थानातील काँग्रेसमध्ये निर्माण झालेले राजकीय संकट तात्पुरते का होईना संपुष्टात आले.

मात्र, राजस्थानची धुरा कोणाच्या हाती राहणार याबाबत मात्र अजूनही साशंकता दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणुकीतून बाहेर पडल्यावर गहलोतांना मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आता हायकमांडवर सोडला आहे.

त्यामुळे सीएम पदावर तुम्हीच कायम राहणार का या प्रश्नावर मात्र त्यांनी याचा निर्णय सोनिया गांधीचे घेतील असंही स्पष्ट केले.

तर दुसरीकडे राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर गहलोत यांनी रविवारी सोनियांची भेट घेऊन त्यांनी राजस्थानातील राजकीय घडामोडींचा सगळा इतिहास त्यांनी लेखी स्वरुपात हायकमांडला दिला आहे.

हा लेखी अहवाल देताना त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत राजस्थानातील राजकीय नाट्यामध्ये आपण अपयशी ठरलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर गेहलोत सांगितले की, गेल्या 50 वर्षांपासून मी काँग्रेसचा निष्ठावान सैनिक आहे. रविवारी घडलेल्या घटनेमुळे सर्वानाच धक्का बसला आहे.

त्यामुळे मीही दुःखी आहे.आणि ते फक्त मीच जाणू शकतो. त्या घटनेमुळे मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे हाच संदेश साऱ्या देशात गेल्यानेही मी दुःखी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अशोक गहलोत यांनी रविवारी जयपूरमध्ये जे राजकीय नाट्य घडले आहे, त्याची त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे.

यावेळी त्यांनी संस्कृती सांगत एका ओळीचा ठराव मंजूर करण्याची आपली परंपरा आहे, परंतु दुर्दैवाने हा ठराव होऊ शकला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनेमुळे मला नेहमीच दु:ख होत राहील असंही त्यांनी सांगितले.

गहलोत यांच्या विधीमंडळ पक्षाची बैठक रद्द झाल्याची नैतिक जबाबदारी त्यांनी घेतल्यानंतर आता भविष्यात ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची जबाबदारी पार पाडणार की नाही याकडे राजस्थानातील आमदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे गहलोत यांनी मागितलेली माफी भावनिकरित्या त्यांच्या पत्त्यावर पडणार काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे सचिन पायलट यांच्याविरुद्ध खेळलेली खेळी ही त्यांच्याच अंगलट आली आहे. त्यामुळे त्यांनी मागितलेली माफी ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर न देता गहलोत यांनी हा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. आता गहलोत यांच्या माफीनंतर सोनिया गांधी त्यांना अध्यक्षपदाव्यतिरिक्त मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतात का,याकडे नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर गहलोत यांनी यापुढे आपण दिल्लीला जाणार नसल्याचे सांगितल्यामुळे सचिन पायलट यांचा राजस्थानातील मार्ग आता खडतर असणार असंही बोललं जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.