AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, या फायरब्रँड नेत्याचा खासदारकीचा राजीनामा

राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीला सत्तापालट होण्याची पंरपरा यंदा ही कायम राहिली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव झाला असून येथे भाजपने विजय मिळवला आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत दिल्लीत घडामोडी सुरु आहेत. भाजपच्या कोणत्या नेत्याच्या गळ्यात माळ पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, या फायरब्रँड नेत्याचा खासदारकीचा राजीनामा
Rajasthan cm
| Updated on: Dec 07, 2023 | 3:21 PM
Share

Rajasthan CM : राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्यस्थानमध्ये अनेक जण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा अलवर येथील भाजप खासदार बाबा बालकनाथ यांच्या नावाची आहे. बाबा बालकनाथ यांनी आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. तिजारा मतदारसंघातून बाबा बालकनाथ आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या इम्रान खान यांच्या पराभव केला. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

कोण आहेत बाबा बालकनाथ

महंत बालकनाथ योगी हे बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे (BMU) कुलपती आहेत. ते हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचे 8 वे महंत देखील आहेत. 29 जुलै 2016 रोजी महंत चंदनाथ यांनी बालकनाथ योगी यांना उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बाबा रामदेव यांनी उपस्थित असलेल्या समारंभात त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

बेहरोर तहसीलच्या कोहराना गावात एका यदुवंशी हिंदू कुटुंबात जन्मलेल्या बालकनाथ योगींची यांचा दबदबा अलवरमध्ये आहे. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडून आश्रमात गेले.

भाजपच्या तिकिटावर खासदार

बाबा खेतनाथ यांनी लहान वयातच त्यांचे नाव गुरुमुख ठेवले होते. ते मत्स्येंद्र महाराज आश्रमात १९८५-१९९१ पर्यंत राहिले, त्यानंतर ते महंत चांदनाथ यांच्यासमवेत हनुमानगढ जिल्ह्यातील नथवली थेरी गावातील मठात गेले. महंत बालकनाथ योगी यांच्या राजकीय खेळीला त्यांचे गुरू महंत चांदनाथ यांनी आकार दिला, जे अलवरचे माजी खासदार होते.

आपल्या गुरूंच्या पावलावर पाऊल ठेवून बालकनाथ योगी हरियाणातील बाबा मस्तनाथ मठाचे प्रमुख म्हणून त्यांच्यानंतर आले. 2019 मध्ये, भारतीय जनता पक्षाने त्यांना राजस्थानमधील अलवर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार केले. बाबा बालकनाथ यांनी काँग्रेसच्या भंवर जितेंद्र सिंह यांचा ३ लाख मतांनी पराभव केला होता.

राजस्थानचे योगी म्हणून ओळख

बाबा बालकनाथ यांचे समर्थकही त्यांना ‘राजस्थानचे योगी’ म्हणून संबोधतात. त्यांची प्रतिमा ‘हिंदू आणि हिंदुत्व’ याविषयी बोलणाऱ्या राजस्थानमधील एका फायरब्रँड नेत्यासारखी आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुलडोझर घेऊन अनेक ठिकाणी प्रचारही केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही त्यांचे विशेष नाते आहे. बाबा बालकनाथ हे त्याच नाथ संप्रदायाचे आहेत, ज्याचे योगी आदित्यनाथ हे सध्याचे प्रमुख आहेत. योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायातील सर्वात मोठे मठ असलेल्या गोरक्षनाथ पीठाचे महंत देखील आहेत.

बालकनाथ हे नाथ संप्रदायाचे आठवे संत आहेत. राज्यात भाजप बाबा बालकनाथ यांच्यासाठी काहीतरी मोठे करण्याचा विचार करत असल्याची चर्चा राजस्थानमध्ये आहे. त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

भाजपने 21 खासदारांना विधानसभेची उमेदवारी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २१ खासदारांना उमेदवारी दिली होती. पक्षाने विधानसभा निवडणुकीत राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी 7, छत्तीसगडमध्ये 4 आणि तेलंगणात 3 खासदार उभे केले होते. त्यापैकी 12 विधानसभा निवडणुकीत विजयी झाले, तर 9 जणांना पराभवाला सामोरे जावे लागले.

राजस्थानमध्ये भाजपने लोकसभा खासदार राज्यवर्धन सिंह राठौर, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, देव जी पटेल, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी आणि राज्यसभा खासदार किरोरी लाल मीना यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यापैकी राठोड, दिया कुमारी, बाबा बालकनाथ आणि किरोरी लाल मीना यांना निवडणुकीत यश मिळाले, तर देवजी पटेल, नरेंद्र कुमार आणि भगीरथ चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.