AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajnikant | रजनीकांत यांचा अखेर राजकारणाला पूर्णविराम; पक्षही विसर्जित

राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ (RMM) हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. (rajinikanth)

Rajnikant | रजनीकांत यांचा अखेर राजकारणाला पूर्णविराम; पक्षही विसर्जित
Rajinikanth
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 12:42 PM
Share

चेन्नई: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणालाच पूर्णविराम दिला आहे. राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही, असं स्पष्ट करतानाच रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ (RMM) हा राजकीय पक्ष विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. (Rajinikanth dissolved his political organization RMM, said no plan to return to politics)

‘रजनी मक्कल मंद्रम’ हा संपूर्ण पक्ष विसर्जित करण्यात येत आहे. यापुढे हा पक्ष कार्यरत राहणार नाही, अस्तित्वात राहणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. भविष्यात राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही. मी राजकारणात येणार नाही, असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. रजनीकांत यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

तामिळनाडूत राजकीय हालचाल सुरू

29 डिसेंबर 2020 रोजी रजनीकांत यांनी राजकारणात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याबाबत विचार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे तामिळनाडूतील राजकारणात हालचाल सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका न लढण्याचा निर्णयही घेतला. त्यामुळे रजनीकांत राजकारण सोडणार असल्याचं म्हटलं जात होतं. आता त्यांनी त्यांच्या राजकारणात येण्याबाबतच्या संभ्रमावर पडदा टाकला आहे.

रजनीकांत यांनी गेल्यावर्षी एक चिठ्ठी लिहून त्यांची भूमिका जाहीर केली होती. मी राजकीय पक्ष सुरू करू शकत नाही, याचा मला खेद आहे. अत्यंत जड अंतकरणाने मी हा निर्णय घेत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी त्यांनी कोरोनाचं कारणही पुढे केलं होतं. मी लोकांना भेटलो आणि कोरोना संक्रमित झालो तर माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही संसर्ग होईल. त्यांनाही संघर्ष करावा लागेल. जीवनातील शांततेसह त्यांचं मोठं आर्थिक नुकसानाही होईल, असं रजनीकांत म्हणाले होते.

सर्वाधिक फॅन्स क्लब

तामिळनाडूतील राजकारणात कोणत्या अभिनेत्याचे किती फॅन्स आहेत हे सुद्धा महत्त्वाचं मानलं जात आहे. हे फॅन्स एकप्रकारे मतदारच असतात आणि राज्यातील राजकारणावर प्रभाव पाडत असतात. तामिळनाडूत कमल हसन यांचे 5,00,000 फॅन्स क्लब आहेत. तर रजनीकांत यांचे केवळ 50,000 फॅन्स क्लब आहेत. त्यामुळे कमल हसन या फॅन्सच्या जोरावर तामिळनाडूचं राजकारण फिरवू शकतात, असंही बोललं जात आहे. कमल हसन यांच्या फॅन्स क्लबला ‘नरपानी इयेक्कम’ म्हटलं जातं. याचा अर्थ चांगल्या कामासाठी आंदोलन करणारे. हसन यांचे फॅन्स क्लब चांगल्या सामाजिक कामावर भर देत असतात, तर रजनीकांत यांचे फॅन्स क्लब रजनीकांत यांची पूजा करण्यावर भर देतात, हा या दोन्ही फॅन्स क्लबमधला मूलभूत फरक आहे. (Rajinikanth dissolved his political organization RMM, said no plan to return to politics)

संबंधित बातम्या:

रजनीकांत यांची राजकारणातून माघार; कमल हसन पोकळी भरून काढणार?; वाचा सविस्तर रिपोर्ट

Rajnikant | सुपरस्टार रजनीकांतची राजकारणात नो एन्ट्री! काय आहे कारण?

Special Report | फडणवीस, राऊतांचं ‘मिशन पुणे’; शिवसेना-भाजपची जोरदार तयारी

(Rajinikanth dissolved his political organization RMM, said no plan to return to politics)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...