AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक विवाह ऐसा भी! दोन्ही बहिणींनी एका तरूणासोबतच केलं लग्न, कारण वाचून तुम्हीच म्हणताल…

लव्ह मॅरेज, कोर्ट मॅरेज म्हटलं की चर्चा होतेच. पण आता एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नाबाबत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

एक विवाह ऐसा भी! दोन्ही बहिणींनी एका तरूणासोबतच केलं लग्न, कारण वाचून तुम्हीच म्हणताल...
लग्नमंडपात वीजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू
| Updated on: May 17, 2023 | 8:59 PM
Share

नवी दिल्ली : प्रत्येक वधू-वरासाठी लग्न हे सात जन्माचं पवित्र बंधन मानलं जातं. सध्या एखाद्याचं लग्न म्हटलं की तो चर्चेचा विषय ठरतोच. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या धर्मानुसार वेगवेगळ्या लग्नाच्या पद्धती पाहिल्या आहेत. त्याचबरोबर लव्ह मॅरेज, कोर्ट मॅरेज म्हटलं की चर्चा होतेच. पण आता एका अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नाबाबत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

राजस्थानमधील टोक जिल्ह्यात चक्क दोन मुलींनी एका मुलाशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या दोन मुली एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. सख्ख्या बहिणींनी एका मुलाशी लग्न केल्याने सर्व लोक चकित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच तुम्ही अशाच एका लग्नाबद्दल ऐकलं असेल. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे दोन जुळ्या बहिणींनी एका मुलाशी लग्न केलं होतं. त्यांचंही लग्न त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं. तसंच आता राजस्थानमध्येही असाच प्रकार झाल्याने सगळीकडे चर्चा आहे.

या अनोख्या लग्नाचा प्रकार मोरझाला येथील झोपडिया गावात घडलेला आहे. या गावातील हरिओम नावाच्या एका मुलाच्या घरचे त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. त्यावेळी सीदडा गावात राहणारे बाबुलाल मीणा यांची मुलगी कांताचं स्थळ हरिओमसाठी आलं होतं. त्यानंतर हरिओम आणि त्याच्या घरचे कांताला पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी लग्न ठरण्याअगोदर कांताने हरिओम आणि कुटुंबियांसमोर एक अट मांडली. कांताची छोटी बहिण सुमन ही मानसिकरीत्या कमजोर असेन कांताचा तिच्यावर खूप जीव आहे. त्यामुळे कांतानं अट मांडली की ती त्याच मुलाशी लग्न करेन जो मुलगा तिच्याशी आणि तिच्या बहिणीशी लग्न करेल.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिओमनं सांगितलं की, जेव्हा कांतानं ही अट घातली तेव्हा त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला होता. पण कांताचा तिच्या बहिणीवर खूप जीव होता तसंच कांताला तिची आयुष्यभर सेवा करायची होती. बहिणींचं हे प्रेम पाहून हरिओमच्या घरचे लग्नासाठी तयार झाले. तसंच 5 मे रोजी हरिओमचं या दोन बहिणींशी अगदी धुमधडाक्यात लग्न झालं. या अनोख्या लग्नसोहळ्यात मुलगा आणि मुलीकडचे सर्व नातेवाईक उपस्थित होते.

नवरी कांताने याबाबत सांगितलं  की, तिला तिच्या बहिणीची खूप काळजी घ्यायची आहे. तसंच तिनं तिच्या बहिणीला स्वतःसोबत अगदी सावलीप्रमाणे ठेवलं आहे. त्यामुळे तिनं ही लग्नाची अट ठेवली होती. जेणेकरून तिच्या बहिणीचं दुसर्‍या कोणाशी लग्न होऊन तिकडे तिचे हाल किंवा तिला कसलाही त्रास होऊ नये म्हणून. सध्या या अनोख्या लग्नाची चर्चा होत असून अनेक लोक कौतुक करताना दिसत आहेत.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.