AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: मतमोजणी सुरु करा, काँग्रेस हायकमांडची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, पण तक्रारीत महाराष्ट्राचा उल्लेख नाही

Rajya Sabha Election : काँग्रेसचे नेतेही निवडणूक आयोगाकडे दाखल झाले. त्यांनीही आपली बाजू मांडली आणि तातडीने मतमोजणी सुरु करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्राचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी केला नसल्याचं पाहायला मिळालं.

Rajya Sabha Election 2022: मतमोजणी सुरु करा, काँग्रेस हायकमांडची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, पण तक्रारीत महाराष्ट्राचा उल्लेख नाही
काँग्रेस शिष्टमंडळाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाची भेटImage Credit source: TV9
| Updated on: Jun 10, 2022 | 7:46 PM
Share

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मतदान पार पडलं. पण तिन राज्यातील मतमोजणी अद्याप सुरु झालेली नाही. कारण, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रातून काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून भाजपने महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतलाय. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. तसंच दिल्लीतील भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेत आपली बाजू मांडली आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेतेही निवडणूक आयोगाकडे (Election Commission) दाखल झाले. त्यांनीही आपली बाजू मांडली आणि तातडीने मतमोजणी सुरु करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्राचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी केला नसल्याचं पाहायला मिळालं.

मतमोजणी प्रक्रिया तातडीने सुरु करा- काँग्रेस

केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते म्हणाले की, आम्ही पाच लोक आता निवडणूक आयोगाकडे आलो होते. पी. चिदंबरम, रणदीप सुरजेवाला, भुपेश बघेल, हुड्डा, राजीव शुक्ला व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सहभागी होते. आम्ही आमचा मुद्दा निवडणूक आयोगासमोर ठेवला. आम्ही कायद्याच्या आधारे आमचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही सांगितलं की रिटर्निंग ऑफिसर जो आहे त्याने फाईंडिक ऑफ फॅक्ट दिले आहे की त्यांनी तक्रारीचा अभ्यास केला. त्यात कुठल्याही प्रकारच्या प्रायव्हसीचं उल्लंघन झालेलं नाही. त्यामुळे त्याने ती तक्रार स्वीकारली नाही. तेच ऑब्जर्वरचंही मत आहे. त्यामुळे आमचं मत आहे की जी निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आहे ती तुम्ही तातडीने सुरु करा. तुमच्याकडे कुठलंही कारण नाही ती रोखून धरण्याचं.

निवडणूक आयोगाने आम्हा सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. कोणती त्रुटीच मिळाली नाही. तुम्ही विचार करा की एखाद्या वैयक्तिक तक्रारीनंतर काय निवडणूक थांबते का? मग अशा किती तक्रारी येतात लोकसभा, राज्यसभा, विधानसभा निवडणुकीत. त्यामुळे तक्रारीत काही ठोस नसेल, ऑब्जर्व्हरचा रिपोर्ट नसेल, रिटर्निंग ऑफिसरचा रिपोर्ट नसेल, आहेत ते रिपोर्ट काँग्रेसच्या बाजूने आहेत तर मतमोजणी रोखून धरण्यात काहीच अर्थ नाही. आमचं मत निवडणूक आयोगाने ऐकून घेतलं आहे. योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितल्याचं काँग्रेस नेते म्हणाले.

महाराष्ट्राबाबत काँग्रेस नेते बोललेच नाहीत!

दरम्यान, टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीने काँग्रेस नेत्यांना तुम्ही हरियाणाबाबत बोलला, मात्र महाराष्ट्रातही तीन मतं रद्द करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्याबाबत आपलं मत काय? असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याबाबत आपल्याला पूर्ण माहिती नाही. माहिती घेतल्यानंतरच आपण बोलू, असं काँग्रेस नेते म्हणाले.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.