AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची ‘या’ राज्यातही एन्ट्री, 10 जागांवर लढणार

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे (Ramdas Athawale on Assam Election 2021)

रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाची 'या' राज्यातही एन्ट्री, 10 जागांवर लढणार
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
| Updated on: Jan 10, 2021 | 9:45 PM
Share

दिसपूर (आसाम) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आगामी आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. ते रविवारी गुवाहाटीच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान पत्रकारांसोबत बोलताना आगामी आसामच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागांवर लढेल, अशी घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर या निवडणुकीत भाजपसोबत युती करु, असंही त्यांनी सांगितलं (Ramdas Athawale on Assam Election 2021).

आठवले नेमकं काय म्हणाले?

“आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागांवर आपले उमेदवार उभे करेल. एनडीएचा मित्रपक्ष असल्याने आरपीआय लवकर राज्यातील युतीबाबत भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बातचित करेल”, असं आठवले यांनी सांगितलं (Ramdas Athawale on Assam Election 2021).

“या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत सर्बानंद सोनोवाल नक्की पुन्हा मुख्यमंत्री होतील. माझ्या आरपीआय पक्षाचा त्यांना पाठिंबा असेल. जर आरपीआय दहा पैकी पाच-सहा जागांवर विजयी झाली तर आम्ही भाजपसोबत युती करुन बहुमताने एकत्र येऊ”, असं रामदास आठवले म्हणाले.

येत्या मार्च-एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल आणि केरळसह आसाम राज्यातही विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 2016 च्या निवडणुकीत तिथे भाजप सर्वाधिक 60 जागांवर विजयी होऊन मोठा पक्ष बनला होता. आसाममधील भाजप सरकारला सध्या आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटचा पाठिंबा आहे.

हेही वाचा : प्लॅटिना बाईक ते आंतराष्ट्रीय क्रिकेट सामना, ऑस्ट्रेलियात वर्णभेदाची टीका, वाचा मोहम्मद सिराजची संघर्षगाथा

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.