AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू- मुसलमान नव्हे… संकटात कोण? रामदेव बाबांनी थेट कुणाचे नाव घेतले?

योगगुरू रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, देशात हिंदू-मुस्लिम, शीख, ख्रिश्चन नाही, तर देशाचे बालपण, तारुण्य, वर्तमान आणि भविष्य संकटात आहे. आंदोलनासाठी मुलांचा वापर थांबवावा. मुलांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. आंदोलनांमध्ये अराजक आणि हिंसा टाळून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

हिंदू- मुसलमान नव्हे… संकटात कोण? रामदेव बाबांनी थेट कुणाचे नाव घेतले?
Ramdev BabaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 11:31 AM
Share

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर योग गुरू रामदेव बाबा यांनी मोठं विधान केलं आहे. देशामध्ये हिंदू संकटात आहे, ना मुसलमान संकटात आहे, ना शीख, ना ख्रिश्चन संकटात आहे. संकटात देशाचं बालपण आहे. देशाचं तारुण्य आहे. देशाचं वर्तमान आणि भविष्य संकटात आहे. देशाची प्रकृती आणि संस्कृती धोक्यात आहे, असं सांगतानाच काही लोक आंदोलनासाठी मुलांचा वापर करत आहेत. लहान मुलांना आंदोलनात ढकलू नये. मुलं शिकतील कधी? आंदोलनातील मुलांचा वापर बंद व्हावा. आंदोलनात अराजक आणि हिंसा होऊ नये, असं बाबा रामदेव म्हणाले.

जंतरमंतरनंतर रांचीमध्येही विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. देशातील इतर राज्यांमध्येही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपलं शिक्षण सोडून मुलं आंदोलनात वेळ वाया घालवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबांनी हे विधान केलं आहे. मुलं आंदोलन करतील, अधिकाऱ्यांच्या ऑफिसला घेराव घालतील तर मग अभ्यास कधी करतील? असा सवाल रामदेव बाबांनी केला आहे.

अराजक आणि हिंसा होऊ नये

शिक्षण घेणाऱ्या मुलांनी आंदोलनापासून दूर राहिलं पाहिजे. संवैधानिक आणि शांततेच्या मार्गानेच आपल्याला स्वांतत्र्य मिळालं. त्यामुळे आंदोलने अराजक आणि हिंसक होऊ नयेत, असं त्यांनी सांगितलं. दिल्लीच्या जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर रांचीमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा 24 वा दिवस आहे. विद्यार्थी सीबीआय चौकशीची मागणी, जेएसएससी-सीजीएल रद्द करण्याच्या मागणीवर अडून आहेत. आज दुपारी दोन वाजता सरकार आणि विद्यार्थ्यां दरम्यान चर्चा होणार आहे. हेमंत सोरेन यांच्या सरकारने विद्यार्थ्यांना त्यांच्या सल्लागारांसोबत चर्चा करण्यासाठी बोलावलं आहे.

आंदोलनात अश्रूधुराच्या नळकांड्या

यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये चर्चा झाली होती. पण या चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नव्हतं. मागच्यावेळी रांची प्रशासनाने विद्यार्थ्यांवर लाठीमारही केला. विधानसभेच्या दिशेने कूच करणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला होता. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. दरम्यान, यापूर्वीही रामदेव बाबांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारला इशारा दिला होता. मला परत आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असं रामदेव बाबा म्हणाले होते. देशात सरकारी नोकरी भरतीत 99 टक्के घोटाळा होत असतो. लाच घेतल्याशिवाय नोकरी मिळत नाही. जात, धर्म, समूह आणि वशिल्याचा विचार करूनच नोकरी दिली जाते, असा दावाही रामदेव बाबांनी केला होता.

Follow Us
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले