AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Ganga : 5 तारखेपर्यंत 15 हजार नागरिक भारतात परतणार, ऑपरेशन गंगा अंतर्गत मेगा प्लॅन

ऑपरेशन गंगा द्वारे भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं व्यावसायिक विमान सेव पुरवणाऱ्या कंपन्यांचं सहकार्य घेतलं आहे.

Operation Ganga : 5 तारखेपर्यंत 15 हजार नागरिक भारतात परतणार, ऑपरेशन गंगा अंतर्गत मेगा प्लॅन
ऑपरेशन गंगा Image Credit source: Twitter
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 03, 2022 | 9:17 PM
Share

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यातील युद्ध आठव्या दिवशी सुरु आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्या शिष्टमंडळाची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मयादेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा (Operation Ganga) सुरु केलं आहे. या मोहिमेद्वारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना देशात परत आणलं जातं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 22 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या मोहिमेअंतर्गत 6200 भारतीयांना देशात परत आणण्यात आलं आहे. तर येत्या दोन दिवसात विशेष मोहिमेत 7400 भारतीय नागरिकांनी देशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवसांपर्यंत नियमित विमान सेवा पुरवणाऱ्या सेवांमधून 13 हजार 600 हून अधिक भारतीय मायदेशी परतलेले असतील. आणि भारतीय हवाई दलाच्या विमानसेवेतर्फे 1500 नागरिक भारतात येतील. परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय भारतीयांना देशात परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.

आतापर्यंत 6200 जण मायदेशी परतले

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 22 फेब्रुवारीपासून आजपर्यंत 6200 जणांना मायदेशी परत आणण्यात आलं. यूक्रेन रशिया यांच्यातील युद्धामुळं यूक्रेनमधील विमानतळ बंद आहेत.त्यामुळं यूक्रेन शेजारील देशातून भारतीयांना परत आणलं जात आहे. रोमानियातील बुखारेस्टमधून 5 विमानं,हंगेरीतीलल बुडापेस्टमधून 1, पोलंडमधील झेझोहून येथून 2 आणि भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांनी भारतीयांना परत आणण्यात येत आहे. आगामी दोन दिवसात विमानांची संख्या वाढवली जाईल आणि भारतीयांना परत आणलं जाणार आहे. 4 मार्चला 3500 तर 5 मार्चला 3900 व्यक्तींना भारतात आणण्यात येणार आहे.

विमान सेवांचं वेळापत्रक

तारीख विमानसेवा विमामनतळ भारतीय विमानतळ ईटीएविमान फेऱ्या
04.03.2022एअर इंडिया एक्सप्रेस बुचारेस्टमुंबईJanuary 1, 19701
 एअर इंडिया एक्सप्रेस बुडापेस्टमुंबईJanuary 1, 19701
 एअर इंंडियाबुचारेस्टनवी दिल्लीJanuary 1, 19701
 स्पाईस जेटकोसीनवी दिल्ली11:20:00,14:102
 इंडिगोबुडापेस्टनवी दिल्ली04:40, 08:202
 इंडिगोरेझेझोवनवी दिल्ली08:20, 05:20, 06:203
 इंडिगोबुचारेस्टनवी दिल्ली02:30, 03:40, 04:403
 इंडिगोसुईसेव्हानवी दिल्ली04:05,05:052
 विस्ताराबचारेस्टनवी दिल्लीJanuary 1, 19701
 गो फर्स्टबुडापेस्टनवी दिल्लीJanuary 1, 19701

ट्विट

ऑपरेशन गंगा द्वारे भारतीयांना आपल्या देशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं व्यावसायिक विमान सेव पुरवणाऱ्या कंपन्यांचं सहकार्य घेतलं आहे. एअर इंडिया एकस्प्रेस, इंडिगो आणि स्पाईस जेट यांच्यावतीनं संयुक्त मोहीम राबवल जात आहे.यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आता भारतीय हवाई दलाचं देखील सहकार्य घेण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानाचा वापर करण्यात येत आहे. हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग हे चार मंत्री यूक्रेनच्या जवळी देशांमध्ये उपस्थित असून ऑपरेशन गंगावर लक्ष ठेऊन आहेत.

इतर बातम्या:

Supreme Court : उत्पादन शुल्क आकारणीबाबत राज्यांना मर्यादित अधिकार; सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर, युद्धावर तोडगा निघणार?

Follow Us
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल