AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रशियालाच सुनावलं; त्यांच्या ‘या’ वक्तव्यामुळं जग करतय कौतूक…

युक्रेनवरील रशियन हल्ल्याबद्दल बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कठोर शब्दात त्यांना सुनावले.

परराष्ट्र मंत्र्यांनी थेट रशियालाच सुनावलं; त्यांच्या 'या' वक्तव्यामुळं जग करतय कौतूक...
| Updated on: Oct 11, 2022 | 10:24 PM
Share

नवी दिल्लीः रशिया-युक्रेन युद्धाच्या ( War) पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनी कठोर शब्दात रशियाला सुनावले असल्याने त्यांत्या या वक्तव्याची सध्या जगभरात चर्चा होत आहे. रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) या युद्धाबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट आणि टोकदार भूमिका घेत ते म्हणाले की, पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रांचा पुरवठा होत नसल्याने भारत शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यासाठी रशियावर अवलंबून आहे. मात्र हे सांगताना त्यांनी हेही सांगितले की, पाश्चात्य देश पाहत आहेत की आमच्या शेजारी लष्करी हुकूमशाही देश असतानाही त्याला आम्ही मित्रसारखं वागवत आहोत.

सोमवारी युक्रेनवरील रशियन हल्ल्याबद्दल बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी कठोर शब्दात त्यांना सुनावले.

यावेळी ते म्हणाले की, पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे आणि नागरिकांचा जीव घेणे जगाच्या पातळीवर कोणालाही मान्य नाही.

रशिया-युक्रेन संघर्ष असला तरी त्याच्यावर तोडगा निघू शकतो. तो तोडगा संवादाच्या आणि सामोपचाराच्या साहाय्याने सोडवता येतो असंही त्यांनी सांगितले.

त्यामुळे या दोन्हा देशातील असलेला संघर्ष कोणालाही फायदेशीर नाही आणि त्यातून कोणालाच मदतही मिळू शकत नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अशी भूमिका घेतल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

यापूर्वी ही त्यांनी रशियाकडून करण्यात येत असलेल्या तेल आयातीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले होते की, आपल्या देशात दरडोई उत्पन्न 2 हजार डॉलर आहे.

मात्र इथे लोक महागाईला तोंड देऊन तेल विकत घेऊ शकत नाहीत. त्याबरोबरच आमच्या देशातील लोकांना महागाईचा सामना करावा लागू नये म्हणून जगातील कोणत्याही राष्ट्राबरोबर आम्ही भारतीयांसाठी व्यवहार करायला तयार आहोत आणि ती आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.