AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसीच्या निर्णयाचं स्वागत, 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास राज्यपालांचा नागरी सत्कार करु : संजय राऊत

वसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईला ओरबडण्याचा केंद्रातील मोदी सरकारकडून सुरु असणारा प्रयत्न, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Budget), गोवा निवडणुकीवर (Goa Election) भाष्य केलं.

ओबीसीच्या निर्णयाचं स्वागत, 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास राज्यपालांचा नागरी सत्कार करु : संजय राऊत
Sanjay Raut
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 11:09 AM
Share

संदीप राजगोळकर,टीव्ही 9 मराठी नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईला ओरबडण्याचा केंद्रातील मोदी सरकारकडून सुरु असणारा प्रयत्न, केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प (Budget), गोवा निवडणुकीवर (Goa Election) भाष्य केलं.राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्याबद्दल संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरीषदेच्या 12 जागांचा निर्णय घेतल्यास त्यांचा नागरी सत्कार करु, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईवर घाला करण्याचा प्रयत्न करण्याचं कारस्थान सुरु असल्याचं संजय राऊत म्हणाले. काँग्रेसच्या काळात जितका मुंबईला ओरबडण्याचा प्रयत्न झाला नाही तितक या सरकारच्या काळात ओरबडण्याचं काम सुरु आहे, असं संजय राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

भाजपच्या काळात मुंबईला ओरबडण्याचा प्रयत्न

संजय राऊत यांनी आम्ही वारंवार सांगत असतो की मुंबईवर घाला घलण्याचा प्रयत्न होतोय. मंबईवर सातत्याने अन्याय केला जातोय. मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईतील भाजपच्या नेत्यांनी याबदल बोलले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरविण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत असल्याचं संजय राऊत म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीत झाले नाही, तेवढे यांच्या काळात मुंबईला ओरबडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुंबईची धुळधाण करणे, प्रकल्प, उद्योग धंदे पळविण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईला कमी समजणे, महत्व कमी करणे अशा बाबी सुरु आहेत. सव्वा कोटी मुंबई देते, राष्ट्रहितासाठी आम्ही त्याग केला. आमची पाकीटमारी करून आमच्यावर दादागिरी मुंबईवर सातत्याने अन्याय करायचा. मुंबईला शिवसेनेपासून हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मुठभर उद्योगपतींसाठी बजेट

सरकार जे चालवितात त्या उद्योगपतींसाठी हे बजेट आहे. सर्वसामान्यांसाठी करामध्ये कधीच सवलत मिळत नाही.मुठभर उद्योगपतींसाठी हे बजेट असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेच्या उमेदवारांची भाजपला भीती वाटते

शिवसेना म्हणून आम्ही 60 जागा्ंवर युपीमध्ये निवडणूक लढतोय. आमच्या 9 प्रमुख उमेदवारांचं नामांकन रद्द करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयोगानेदेखील आमचे ऐकले नाही. हा लोकशाहीसाठी घातक प्रकार आहे. आमच्या 50 ते 60 उमेदवारामंची त्यांना भीती वाटते. उत्पल पर्रिकरयांची लढाई भाजपविरोधात असून आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आयाराम गयाराम उमदेवारांचा पराभव पणजीच्या जनतेने करावा, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

Pune Election : पुणे महापालिकेची प्रभागरचना जाहीर, सत्तेच्या चाव्या नव्यानं समाविष्ट 34 गावांच्या हाती जाणार?

तिसऱ्या नवऱ्याचा चारित्र्यावर संशय, एकनिष्ठता सिद्ध करण्यासाठी विवाहितेने दिरापासून झालेल्या मुलीला पेटवलं

Sanjay Raut comment on Governor Bhagatsingh Koshyari and 12 MLC members of Maharashtra Legislature

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.