AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वर्षांचा मुलगा बनला दोन मुलांचा बाप, सत्य समोर येताच अख्ख गाव हादरलं, उडाली एकच खळबळ

एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पाच वर्षांचा मुलगा दोन मुलांचा बाप बनला, मात्र सत्य समोर येताच अख्खं गाव हादरलं आहे.

5 वर्षांचा मुलगा बनला दोन मुलांचा बाप, सत्य समोर येताच अख्ख गाव हादरलं, उडाली एकच खळबळ
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 03, 2026 | 8:39 PM
Share

देशामध्ये मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया सुरू झाली आहे, एसआयआर सुरू असताना मोठा गोंधळ समोर येत आहे. मध्यप्रदेशपासून ते पश्चिम बंगालपर्यंत एसआयआर सुरू आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामुळे या गावात राहणाऱ्या लोकांना प्रचंड धक्का बसला आहे. पूर्व बर्धमान जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये एका पाच वर्षांच्या मुलाला दोन मुलांचे वडील असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र जेव्हा ही गोष्ट तेथील प्रशासनाला कळाली तेव्हा चांगलाच गोंधळ उडाला या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ही घटना पूर्व बर्धमान जिल्ह्यातल्या मंगलकोट पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शीतल गावमध्ये घडली आहे. एसआयआर दरम्यान एका कुटुंबाचं मतदार यादीतील नाव चेक करत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाकडून झालेली ही चूक संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला विषय बनली आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार यादीनुसार सरोज मांझी यांचं वय 63 वर्ष आहे, तर त्यांचे दोन कथित मुलं लक्ष्मी मांझी यांचं वय 59 आणि सागर मांझी यांचं वय 58 वर्ष एवढं आहे, याचाच अर्थ सरोज मांझी हे केवळ आपल्या दोन्ही मुलांपेक्षा फक्त पाच वर्षांनी मोठे आहेत. म्हणजेच ते पाचव्याच वर्षीच दोन मुलाचे वडील बनले आहेत, जे की हे अशक्य आहे. हे प्रकरण शीतल गावामधील बूथ क्रमांक 175 शी संबंधित आहे, एसआयआर अंतर्गत कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन सुरू आहे, याचदरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक म्हणजे हे प्रकरण समोर येताच सरोज मांझी यांच्या दोन कथित मुलांनी धक्कादायक कबुली दिली आहे. आम्ही सरोज मांझी यांचे मुलं नसून, आम्ही त्यांच्या नावाचा वापर केला आहे, परंतु आमचं मुळ गावं हे बांगलादेशात आहे, आम्ही 22 वर्षांपूर्वी आधी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे आलो आणि त्यानंतर कामाच्या शोधात मंगलकोटमधील शीतल गावात आलो अशी कबुली त्यांनी दिली आहे, आणि त्यानंतर आमच्या नावाचा मतदार यादीमध्ये समावेश देखील झाला, असं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली