AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shankaracharya : ‘जर, जात सोडली, तर…’ धीरेन्द्र शास्त्री यांना शंकराचार्यांनी सुनावले खडेबोल

Shankaracharya avimukteshwaranand : धीरेन्द्र शास्त्री यांनी सनातन धर्मातील जाती-पातींविरोधात पदयात्रा काढली आहे. त्याविरोधात हिमालयातील बदरिकाश्रमाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी भूमिका घेतली आहे. त्यांनी बागेश्वर बाबा यांना काही गोष्टी सुनावल्या आहेत.

Shankaracharya : 'जर, जात सोडली, तर...' धीरेन्द्र शास्त्री यांना शंकराचार्यांनी सुनावले खडेबोल
dhirendra shastri
| Updated on: Nov 27, 2024 | 1:46 PM
Share

धीरेन्द्र शास्त्री यांनी सनातन धर्मातील जाती-पातींविरोधात पदयात्रा काढली आहे. या यात्रेला हिमालयातील बदरिकाश्रमाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला आहे. धीरेन्द्र शास्त्री एका पक्षाचे एजंट बनलेत, असं शंकराचार्य म्हणाले. त्या पक्षासाठी हिन्दू वोट बँक गोळा करण्याच काम धीरेन्द्र शास्त्रींकडून सुरु आहे अशा शब्दात अविमुक्तेश्वरानंद यांनी टीका केली. “हिंदू धर्म समजणाऱ्यांना जाती आणि वर्ण सनातनाच महत्त्व माहित आहे, हे संपवण्याविषयी बोलणारे हिंदू विरोधी आहेत” असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

‘जाति-पांति की करो विदाई हिन्दू हिन्दू भाई भाई’ असं धीरेन्द्र शास्त्री बोलत आहेत. “तुम्ही जाती-पाती संपवण्याविषयी बोलता, तेव्हा तुम्ही सनातनी राहत नाही” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. तुम्ही सनातनी राहिला नाहीत, तर भाऊ-भाऊ बनून कसे रहाल? असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. धीरेन्द्र शास्त्री पॉलिटिकल एजेंडा घेऊन लोकांमध्ये गेले आहेत, असं अविमुक्तेश्वरानंद यांचं मत आहे.

‘सरकारने केवळ दोन जाती बनवाव्यात’

“वर्णआश्रम मान्य करुन कोणाचा द्वेष करु नये, कोणाला कमीपणा दाखवू नये, यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. जर, जात सोडली, तर ओळख संपून जाईल” असं शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद म्हणाले. धीरेंद्र शास्त्री यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं होतं. “आपल्याला भारतात जात-पात, श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेदभाव मिटवायचा आहे. लोकांच आडनाव असेल, पण सरकारने केवळ दोन जाती बनवाव्यात. त्याचवेळी भारत समृद्ध होईल” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. “भारतात वर्तमानात अंधविश्वास रोखण्याची गरज आहे. आपल्याला सरकारवर अवलंबून रहायच नाहीय. बागेश्वर बाबा हिन्दू राष्ट्र बनवू शकत नाही. भारताच्या प्रत्येक युवा भाऊ-बहिणीने बागेश्वर बाबा बनावं, तेव्हाच हिंदू राष्ट्र निर्मिती होईल” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.

Follow Us
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य