AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shankaracharya : ‘जर, जात सोडली, तर…’ धीरेन्द्र शास्त्री यांना शंकराचार्यांनी सुनावले खडेबोल

Shankaracharya avimukteshwaranand : धीरेन्द्र शास्त्री यांनी सनातन धर्मातील जाती-पातींविरोधात पदयात्रा काढली आहे. त्याविरोधात हिमालयातील बदरिकाश्रमाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी भूमिका घेतली आहे. त्यांनी बागेश्वर बाबा यांना काही गोष्टी सुनावल्या आहेत.

Shankaracharya : 'जर, जात सोडली, तर...' धीरेन्द्र शास्त्री यांना शंकराचार्यांनी सुनावले खडेबोल
dhirendra shastri
| Updated on: Nov 27, 2024 | 1:46 PM
Share

धीरेन्द्र शास्त्री यांनी सनातन धर्मातील जाती-पातींविरोधात पदयात्रा काढली आहे. या यात्रेला हिमालयातील बदरिकाश्रमाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला आहे. धीरेन्द्र शास्त्री एका पक्षाचे एजंट बनलेत, असं शंकराचार्य म्हणाले. त्या पक्षासाठी हिन्दू वोट बँक गोळा करण्याच काम धीरेन्द्र शास्त्रींकडून सुरु आहे अशा शब्दात अविमुक्तेश्वरानंद यांनी टीका केली. “हिंदू धर्म समजणाऱ्यांना जाती आणि वर्ण सनातनाच महत्त्व माहित आहे, हे संपवण्याविषयी बोलणारे हिंदू विरोधी आहेत” असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

‘जाति-पांति की करो विदाई हिन्दू हिन्दू भाई भाई’ असं धीरेन्द्र शास्त्री बोलत आहेत. “तुम्ही जाती-पाती संपवण्याविषयी बोलता, तेव्हा तुम्ही सनातनी राहत नाही” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. तुम्ही सनातनी राहिला नाहीत, तर भाऊ-भाऊ बनून कसे रहाल? असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले. धीरेन्द्र शास्त्री पॉलिटिकल एजेंडा घेऊन लोकांमध्ये गेले आहेत, असं अविमुक्तेश्वरानंद यांचं मत आहे.

‘सरकारने केवळ दोन जाती बनवाव्यात’

“वर्णआश्रम मान्य करुन कोणाचा द्वेष करु नये, कोणाला कमीपणा दाखवू नये, यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे. जर, जात सोडली, तर ओळख संपून जाईल” असं शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद म्हणाले. धीरेंद्र शास्त्री यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं होतं. “आपल्याला भारतात जात-पात, श्रेष्ठ-कनिष्ठ हा भेदभाव मिटवायचा आहे. लोकांच आडनाव असेल, पण सरकारने केवळ दोन जाती बनवाव्यात. त्याचवेळी भारत समृद्ध होईल” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. “भारतात वर्तमानात अंधविश्वास रोखण्याची गरज आहे. आपल्याला सरकारवर अवलंबून रहायच नाहीय. बागेश्वर बाबा हिन्दू राष्ट्र बनवू शकत नाही. भारताच्या प्रत्येक युवा भाऊ-बहिणीने बागेश्वर बाबा बनावं, तेव्हाच हिंदू राष्ट्र निर्मिती होईल” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.