AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझी शंका खरी ठरली… शरद पवार असं का म्हणाले? सिंधु करार स्थगिती, पाकिस्तानचे निर्बंध… पवार काय म्हणाले?

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचा ताणलेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत.

माझी शंका खरी ठरली... शरद पवार असं का म्हणाले? सिंधु करार स्थगिती, पाकिस्तानचे निर्बंध... पवार काय म्हणाले?
sharad pawar on pahalgam terror attack
| Updated on: Apr 25, 2025 | 3:46 PM
Share

Sharad Pawar On Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचा ताणलेले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांवर वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केले आहे. त्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काही निर्णय घेतले आहेत. यावरच आता खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. पाकिस्तान अॅक्शन घेईल याची मला शंका होती, ती खरी ठरली असं भाष्य शरद पवारांनी केलंय.

…ती खरी ठरली- शरद पवार

“पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एकूण पाच निर्णय घेतले. एका दृष्टीने पाकिस्तानला एक मेसेज देण्याचं काम भारताने केलं. आता पाकिस्ताननेही काही निर्णय घेतलेत. भारताचं विमान त्यांच्या देशात जाणार नाही हे त्यांनी ठरवलं आहे. आपल्या विमानांना पाकिस्तानमधून प्रवास करावा लागतो. आता ते बंद केलं तर आपल्याला दूरच्या मार्गाने जावं लागेल. त्यामुळे प्रवास आर्थिकदृष्ट्या अधिक महाग होईल. आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल. पण पाकिस्तान गप्प बसेल असं नव्हे. तेही अॅक्शन घेतील. ही शंका मला होती, ती खरी ठरली,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवारांनी केली सरकारकडे महत्त्वाची मागणी

पहलगाममधील झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरच्या पर्यटनावरही परिणाम होणार आहे. त्यावरही शरद पवार यांनी मत व्यक्त केलं. “पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा काश्मीरचे लोकं रस्त्यावर उभे राहिले. भारताच्या बाजूने उभे राहिले. ही जमेची बाजू आहे. जे लोक भारताच्या बाजूने उभे राहिले त्यांचा चरितार्थ हा कदाचित संकटात जाईल अशी स्थिती आहे. याचीच मला काळजी याची आहे. काश्मीरचं अर्थकारण संकटात येईल. लोक पर्यटनाला जाणार नाहीत. याचा परिणाम काश्मीरच्या लोकांवर होईल. लोक काश्मीरला जाणार नाहीत. त्याची झळ स्थानिकांना बसेल, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. तसेच काश्मीरमधील पर्यटन वाढावे तसेच तेथील स्थानिकांचा चरितार्थ भागावा यासाठी केंद्राने अधिक लक्ष दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय