AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit: अबू धाबीमध्ये SHEconomy अजेंडा लॉन्च, समाजाच्या सक्षमीकरणासाठी महिलांची भूमिका महत्वाची, राजदूत संजय सुधीर यांचे विधान

TV9 न्यूज नेटवर्कचे 'न्यूज9 ग्लोबल समिट'चे यूएईतील अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी SHEeconomy अजेंडा देखील सुरू करण्यात आला आहे. यावर युएईमधील भारताचे राजदूत संजय सुधीर यांनी भाष्य केले आहे.

News9 Global Summit: अबू धाबीमध्ये SHEconomy अजेंडा लॉन्च, समाजाच्या सक्षमीकरणासाठी महिलांची भूमिका महत्वाची, राजदूत संजय सुधीर यांचे विधान
sunjay sudhir
| Updated on: Aug 27, 2025 | 10:11 PM
Share

TV9 न्यूज नेटवर्कचे ‘न्यूज9 ग्लोबल समिट’चे यूएईतील अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले आहे. अमिराती महिला दिनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या समिटमध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि समावेशकतेवर चर्चा झाली. यावेळी SHEeconomy अजेंडा देखील सुरू करण्यात आला आहे. याद्वारे व्यवसाय, समाज आणि प्रशासनात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी एक रोडमॅप तयार केला जाणार आहे. तसेच महिलांना सर्व आघाड्यांवर मार्गदर्शन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी युएईमधील भारताचे राजदूत संजय सुधीर देखील उपस्थित होते, त्यांनी या खास उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल TV9 चे कौतुक केले.

महिला समाजाच्या सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू – संजय सुधीर

संजय सुधीर आपल्या भाषणात म्हणाले की, महिला सक्षमीकरण हे समाजाच्या सक्षमीकरणाचे केंद्रबिंदू आहे. यावेळी सुधीर यांनी गिर्यारोहणापासून अंतराळवीर बनण्यापर्यंत सर्व क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचा उल्लेख केला. तसेच कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू यांच्यासारख्या महिलांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कसे योगदान दिले यावरही त्यांनी भाष्य केले. आज महिला सरकारमध्ये सर्वोच्च पदांवर आहेत आणि त्यांची भूमिका महत्वाची आहे असंही ते म्हणाले.

प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर

संजय सुधीर पुढे बोलताना म्हणाले की, महिलांचा समान आर्थिक सहभाग हा समतावादी समाज निर्माण करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. यावेळी त्यांनी भारतातील महिला राष्ट्रपती, महिला पंतप्रधान आणि महिला मुख्यमंत्री यांचा उल्लेख करत भारताची प्रगती अधोरेखित केली. तसेच चंद्रयान-मंगळयान अशा ऐतिहासिक अंतराळ मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांच्या कामाचेही कौतुक केले. महिला संरक्षण, ऊर्जा आणि विमान वाहतूक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावत आहेत, तसेच त्या भारत-यूएई पार्टनरशीपचा कणा आहेत असंही सुधीर यांनी म्हटलं आहे.

महिलांचे सक्षमीकरण हे जागतिक आव्हान

सुधीर यांनी पुढे बोलताना, महिला समानता ही केवळ सरकारांची नव्हे तर मीडिया आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. महिलांचे सक्षमीकरण हे राष्ट्रीय नसून जागतिक आव्हान आहे. यावर सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. भारत-यूएई पार्टनरशीप आणखी मजबूत करण्यात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असंही विधान केलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.