AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात सुरक्षित कारही वाचवू शकली नाही CEO चे प्राण, सहा लोकांच्या मृत्यूनंतर रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

अपघातग्रस्त ट्रकवर एल्युमिनियम लोड केलेले होते. अवजड वाहनांना त्यांच्या वजनामुळे रोकणे अवघड असते. यामुळे भीतीने ब्रेक दाबणे जोखमीचे असते. ट्रक चालक आरिफ याच्यावर बेपर्वाईने वाहन चालविणे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

सर्वात सुरक्षित कारही वाचवू शकली नाही CEO चे प्राण, सहा लोकांच्या मृत्यूनंतर रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
| Updated on: Dec 23, 2024 | 9:47 PM
Share

बंगलुरु येथे एका भीषण अपघातात एका कंपनीच्या सीईओसह सहा जणांचा प्राण गेल्याची घटना शनिवारी घडली आहे. या अपघातानंतर भारतातील रस्ते सुरक्षा आणि कार सेफ्टी संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या अपघातात मृत्यू पावलेले लोक Volvo XC90 या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कारमधून प्रवास करीत होते. Volvo कारला जगातील सर्वात सुरक्षित कार मानले जात आहे. या नंतरही कारमधील सहा प्रवासी ठार झाल्याने कारच्या सुरक्षेवरुन सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकीला जोपर्यंत शिस्त लागत नाही तोपर्यंत सुरक्षित कार देखील प्रवाशांचे प्राण वाचवू शकत नाही असे म्हटले जात आहे.

हा भीषण वाहन अपघात नेलमंगला-तुमकुर हायवेवर झाला आहे. वोल्वो एक्ससी 90 कारला एका कंटेनर ट्रकने चिरडून टाकले. ट्रक डिवायडरवरून जम्प करुन आला त्याने व्होल्वोला चिरडले. यात व्होल्वो चालकाची कोणतीही चूक नव्हती. या व्होल्वो कारमधून प्रवास करणारे सीईओ चंद्रम येगापगोल (48), त्यांची पत्नी गौराबाई (42), त्यांचा मुलगा ज्ञान (16), मुलगी दीक्षा (12) वहिनी विजयलक्ष्मी (36) आणि विजयलक्ष्मी यांची मुलगी आर्या (6)अशा सहा जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे.चंद्रम येगापागोल हे बंगलुरु येथील ऑटोमोटिव्ह सॉल्यूशन्स फर्म आयएएसटी सॉफ्टवेयर सॉल्यूशन्स कंपनीचे मुख्य संचालक आणि सीईओ होते. त्यांनी दोनच महिन्यांपूर्वी ही कार विकत घेतली होती. पोलिसांच्या माहीतीनुसार या अपघातात चंद्रम येगापागोल सुरक्षितपणे वाहन चालवित होते. त्यांची कोणतीही चूक नव्हती.

दूसऱ्या कारला वाचवताना अपघात

या अपघातात कंटेनर ट्रकचा चालक आरिफ जखमी झाला आहे. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले की,’ माझ्या समोरील कारने अचानक ब्रेक मारला. त्याच्या होणारी धडक टाळण्यासाठी मी देखील अचानक ब्रेक दाबला. परंतू ट्रन न थांबता पुढे गेला. कारला वाचविण्यासाठी डाव्या बाजूला ट्रक वळविला. त्यामुळे ट्रकने डिव्हायडरवरुन उडी मारत दूधाच्या ट्रकला टक्कर मारली. आणि त्याच्या मागे असलेल्या व्होल्वो कारवर तो पलटी झाला. मला माहीत नव्हते की या अपघातात सहा जण ठार झाले आहेत.’

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.