AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka; श्रीलंकेच्या संकटाविषयी सोनिया गांधींना म्हणाल्या; या वाईट काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत; तुमच्या मदतीसाठी भारत प्रयत्नशील राहिल

मुंबईः श्रीलंकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली असतानाच भारतातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे श्रीलंकेविषयी आपली भावना व्यक्त करत म्हटले आहे की, श्रीलंकेच्या या गंभीर संकटाच्या वेळी आम्ही श्रीलंकेसोबत आहोत, त्याविषयी तेथील लोकांसोबत आम्ही एकतेची भावना व्यक्त करत असून आशा करते की ते त्यावर श्रीलंकेतील नागरिक मात करू शकतील. सध्या श्रीलंकेला […]

Sri Lanka; श्रीलंकेच्या संकटाविषयी सोनिया गांधींना म्हणाल्या; या वाईट काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत; तुमच्या मदतीसाठी भारत प्रयत्नशील राहिल
| Updated on: Jul 10, 2022 | 3:27 PM
Share

मुंबईः श्रीलंकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अस्थिर झालेली असतानाच भारतातून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्राद्वारे श्रीलंकेविषयी आपली भावना व्यक्त करत म्हटले आहे की, श्रीलंकेच्या या गंभीर संकटाच्या वेळी आम्ही श्रीलंकेसोबत आहोत, त्याविषयी तेथील लोकांसोबत आम्ही एकतेची भावना व्यक्त करत असून आशा करते की ते त्यावर श्रीलंकेतील नागरिक मात करू शकतील. सध्या श्रीलंकेला सतत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती प्रचंड वाईट झाली (situation in Sri Lanka is hugely bad) आहे. त्या परिस्थितीला कंटाळूनच लोक रस्त्यावर आले आहेत. वाईट काळ आल्यानेच तेथील लोक सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत. श्रीलंकेतील परिस्थिती प्रचंड वाईट असल्या कारणानेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी श्रीलंकेतील नागरिकांसोबत आपण असल्याचे म्हटले आहे.

या काळात आम्ही तुमच्यासोबत

सोनिया गांधी यांनी या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेस या गंभीर संकटाच्या वेळी श्रीलंका आणि तेथील जनतेसोबत आहे. आणि आम्हाला आशा आहे की, तेथील नागरिक या संकटावर मात करू शकतील. त्यासोबतच, त्यांनी आशा व्यक्त केली की, भारत श्रीलंकेच्या लोकांना आणि सरकारला सध्याच्या परिस्थितीच्या अडचणींचा सामना करत असताना त्यांना ते मदत करत राहतील अशी भावनाही त्यांनी त्या पत्रातून व्यक्त केली आहे.

सोनिया गांधींकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरही आवाहन

सोनिया गांधी यांनी त्यामध्ये म्हणाल्या आहेत की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीलंकेतील बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करत आहे. आर्थिक आव्हाने, वाढत्या किंमती आणि अन्न, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यामुळे तेथील लोकांमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही भावना व्यक्त करत असतानाच त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध गटाना, समुदायांना आवाहन करत आहे की, श्रीलंकेला सर्वतोपरी मदत आणि पाठिंबा द्या.

परराष्ट्र खात्याकडूनही पाठिंबा

सोनिया गांधी यांनी पत्र लिहिण्यापूर्वीही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले होते, की, आम्ही श्रीलंकेला पाठिंबा देत आहोत, आणि वाईट काळात त्यांना मदत करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करू.

परकीय चलनाची कमतरता

श्रीलंकेला अभूतपूर्व आर्थिक उलथापालथीचा सामना करावा लागत आहे. 22 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या वाईट काळातून श्रीलंका जात आहे. श्रीलंकेकडे परकीय चलनाची कमतरता असून ज्यामुळे देश इंधन आणि इतर आवश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाहीत. त्यामुळे या परिस्थितीत तेथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी शनिवारी रात्री स्पष्ट केले आहे की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.