AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! RCB च्या सत्कार कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू

RCB Victory Rally Bengaluru Stampede : RCB च्या विजयी मिरवणुकीत मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

मोठी बातमी! RCB च्या सत्कार कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू
rcb victory rally bangalore stampede
| Updated on: Jun 04, 2025 | 6:45 PM
Share

RCB Victory Rally Bengaluru Stampede : आयपीएल 2025 च्या हंगामाचे जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने पटकावले. गेल्या 18 वर्षांपासून हा संघ विजयाचे स्वप्न पाहात होता. शेवटी हे स्वप्न पूर्ण झाले. दरम्यान, या विजयानंतर भारतभरात विजयोत्सव साजरा करण्यात आला. अजूनही बंगळुरू शहरात हा विजयोत्सव संपलेला नाही. असे असताना बंगळुरू शहरातून मोठी माहिती समोर येत आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली असून तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्टेडियमबाहेर मोठी गर्दी!

मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू संघाच्या विजयानंतर बंगळुरू शहरातील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर या संघाचे चाहते मोठ्या संख्येने जमले होते. हे सर्वजण बंगळुरूच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत होते. मात्र याच वेळी अचानक येथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले नेमके कोण आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाहीत.

चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबवर मोठा विजय मिळवल्यानंतर कर्नाटक क्रिकेट असोशिएशनतर्फे बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे बडे नेते उपस्थित राहणार होते. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सर्वच खेळाडू यात सहभागी होणार होते. यामध्ये भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हादेखील येणार होता. या सर्वांचाच या कार्यक्रमात सत्कार होणार होता. ही बाब समजल्यानंतर स्टेडियमच्या बाहरे बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर गर्दी अनियंत्रित झाली आणि यात एकूण 10 जणांचा मृत्यू झाला.

15 ते 20 जण जखमी

धक्कादायक बाब म्हणजे या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. तर 15 ते 20 जण यात जखमी झाले आहेत. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.