AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्षुल्लक कारणासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 25 लाखांचा दंड भरण्याचे आदेश

2017 मध्ये या व्यक्तीला कोर्टाने कोणत्याही कारणाशिवाय 64 PIL दाखल केल्याबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राचा "वारंवार गैरवापर" केल्याबद्दल 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

क्षुल्लक कारणासाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 25 लाखांचा दंड भरण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालय
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 3:06 PM
Share

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अगदी क्षुल्लक कारणांसाठी जनहित याचिका दाखल करणाऱ्याला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड भरण्याचा निर्णय कायम ठेवला. हा व्यक्ती एका नॉन प्रॉफीट एनजीओचा अध्यक्ष आहे. यासोबत न्यायालयाने, अवमान केल्याबद्दल दंडाचा अधिकार कुणीही कोर्टाकडून काढून घेऊ शकत नाही असंही ठणकावून सांगितलं. न्यायालयानं म्हटले की, न्यायालयाच्या अधिकाराचा अवमान कायदेशीर कायद्यानेही काढून घेतला जाऊ शकत नाही. हे सांगतानाच जनहित याचिका दाखल करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षाला न्यायालयाला ” नाराज केलं आणि धमकावलं” या कारणाखाली तब्बल 25 लाख रुपयांचा दंड लावला. ( supreme court power of contempt cannot be taken away even by legislative enactment apex court says)

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, ” आमचं म्हणणं आहे, कोर्टाचा अवमान करणारा व्यक्ती स्पष्टपणे दोषी आहे आणि कोर्टाला नाराज करण्याचं त्याने जे पाऊल उचललं आहे, ते स्वीकार्य नाही. जस्टिस संजय किशन कौल आणि जस्टिस एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने म्हटलं की, एनजीओ सुराज इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष राजीव दाहिया हे कोर्ट, प्रशासनाचे कर्मचारी आणि राज्य सरकारसहित सर्वांवर चिखलफेक करण्याचं काम करत आहेत.

अवमाननेसाठी शिक्षा देण्याचा कोर्टाला अधिकार

खंडपीठाने म्हटले, “अवमान केल्याबद्दल शिक्षा देण्याचा अधिकार हा घटनात्मक अधिकार आहे. कुठलाही कायदा करुनही तो काढून घेता येत नाही.’ हेच नाहीत तर दाहिया यांना कोर्टाने अवमानना नोटीस जारी केली शिवाय पैशाच्या देण्यासंदर्भात खंडपीठाने म्हटले आहे की, ते जमीन महसुलाची थकबाकी म्हणून घेतले जावे

25 लाखांचा दंड ठोठावला

सर्वोच्च न्यायालयाने दहियाला न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली होती आणि विचारले होते की, न्यायालयाचा विरोध करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई का केली जाऊ नये? दहिया यांनी न्यायालयाला सांगितले होते की, त्याच्याकडे दंड भरण्यासाठी आर्थिक संसाधनं नाहीत, त्यामुळे ते दया याचिका घेऊन राष्ट्रपतींकडे जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात दहिया यांच्या 2017 च्या आदेशाला रद्द करण्याच्या मागणीच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. 2017 च्या एका आदेशात, न्यायालयाने कोणत्याही कारणाशिवाय 64 PIL दाखल केल्याबद्दल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राचा “वारंवार गैरवापर” केल्याबद्दल 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.

हेही वाचा:

पाकिस्तानातून आलो, ISI ने 20 हजार दिले, उरीमध्ये नाल्यात लपलो, जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे खुलासे

उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.