AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे इंजिनाचे तापमान 55 डिग्रीवर, धावत्या ट्रेनमध्ये लोको पायलटची प्रकृती बिघडली, अडीच तास स्टेशनवर थांबली रेल्वे

Heat Wave: देशात सर्वत्र तीव्र उष्ण वारे वाहत आहे. राजस्थानमधील तापमान ५० अंश सेल्सियसवर गेले आहे. दिल्लीच्या तापमानाने उच्चांक गाठला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४५ अंशावर आहे. यामुळे या भागात जमावबंदी लागू केली आहे.

रेल्वे इंजिनाचे तापमान 55 डिग्रीवर, धावत्या ट्रेनमध्ये लोको पायलटची प्रकृती बिघडली, अडीच तास स्टेशनवर थांबली रेल्वे
तापमान
| Updated on: May 30, 2024 | 10:50 AM
Share

सध्या देशात सर्वत्र तापमान वाढले आहे. अनेक शहरांमधील पारा 45 अंशाचा वर गेला आहे. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील तापमान 47 डिग्री सेल्सियसवर गेले आहे. तापमानामुळे लोकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. या तापमानाचा फटका मालगाडीमधील लोको पायलटला बसला. इंजिनमधील तापमान 55 डिग्री सेल्सियसवर गेल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. या तापमानात सतत 9 तास काम केल्यानंतर लोको पायलट विनोद कुमार महोबा यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलटी आणि चक्कर आले. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. या प्रकारामुळे रेल्वे स्टेशनवर अडीच तास मालगाडी थांबून होती.

महोब स्टेशनवर मालगाडी थांबवली

लोको पायलटची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे महोबा स्टेशनवर मालगाडी अडीच तास थांबली होती. दुसरा लोका पायलट आल्यानंतर गाडी पुन्हा मार्गस्थ झाली. ही मालगाडी झाशीवरुन निघाली होती. ती बांदा येथे जात होती. मालगाडीच्या इंजिनमधील तापमान 55 डिग्रीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे. सोबत असणारे लोको पायलट गगन सैनी याने सांगितले की, उन्हाच्या त्रासापासून वाचण्यासाठी विनोद कुमार हे दहा लिटर पाणी पिऊन गेले होते. त्यानंतर त्यांना उन्हाचा फटका बसला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली घटनेची माहिती

मालगाडी महोबा स्टेशनच्या आधी कुलपहाड स्टेशनवर असताना विनोद कुमार यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सैनी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सैनी यांना कोणत्याही परिस्थितीत मालगाडी महोबा स्टेशनवर आणण्याचे सांगितले. सैनी यांनी त्या परिस्थितीत गाडी महोबा स्टेशनवर आणली. त्यानंतर विनोद कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

देशात सर्वत्र तीव्र उष्ण वारे वाहत आहे. राजस्थानमधील तापमान ५० अंश सेल्सियसवर गेले आहे. दिल्लीच्या तापमानाने उच्चांक गाठला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमान ४५ अंशावर आहे. यामुळे या भागात जमावबंदी लागू केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.