AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दिवाळीत काळाचा घाला, बसचा भीषण अपघात,10 प्रवाशांचा मृत्यू , 20 गंभीर जखमी

खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.

ऐन दिवाळीत काळाचा घाला, बसचा भीषण अपघात,10 प्रवाशांचा मृत्यू , 20 गंभीर जखमी
| Updated on: Oct 29, 2024 | 5:31 PM
Share

राजस्थानच्या सीकरमध्ये आज दुपारी भीषण अपघात झाला आहे.सीकर जिल्ह्याच्या लक्ष्मण गढ परिसरात प्रवाशांनी भरलेली एक प्रायव्हेट बस पुलावर अनियंत्रित झाली आणि त्यानंतर ती पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. या घटनेत बसचा चक्काचूर झाला असून, या बसमधील दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये एकूण चाळीस प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलि‍सांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सीकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, बर प्रचंड वेगात होती, अचानक अनियंत्रित झाली आणि पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या अपघातामध्ये दाहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये बसचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघात घडला तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाला आहे, मात्र चालकाचं बसवरील नियंत्रण अचानक कसं सुटलं याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच