AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या राज्यात बनतंय पहिलं रेल्वे स्टेशन, होय आताशी पोहतेय येथे रेल्वे

भारतातील सर्वच राज्यात रेल्वे पोहोचली आहे अशी जर तुमची समज असेल तर ती चुकीची आहे. कारण अजूनही देशाच्या काही भागात रेल्वे पोहोचू शकलेली नाही. आज पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते या राज्यात पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी करण्यात आली आहे. कोणते आहे ते राज्य जाणून घ्या.

भारतातील या राज्यात बनतंय पहिलं रेल्वे स्टेशन, होय आताशी पोहतेय येथे रेल्वे
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 26, 2024 | 7:42 PM
Share

First Railway Station : भारतात रेल्वेचं जाळं इतकं मोठं आहे की, त्यामुळे शहरं जवळ आली आहेत. पण तुम्हाला वाटत असेल की देशातील प्रत्येक राज्यात रेल्वे पोहोचली आहे. पण असे नाही. असं एक राज्य आहे जिथे अजूनही रेल्वे पोहोचलेली नाही. आता पंतप्रधान मोदी यांनी आज येथे राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायभरणी केली आहे. भारतात इंग्रजांच्या काळातच रेल्वे सुरु झाली होती. पण आज इतके वर्ष झाले तरी भारताच्या या राज्यात रेल्वे पोहोचली नव्हती. कोणतं आहे ते राज्य जाणून घेऊयात.

कोणतं आहे ते राज्य

भारताच्या नकाशावर असलेलं सुंदर राज्य म्हणजे सिक्कीम. मात्र येथे रेल्वे अद्याप पोहोचलेली नाही. सिक्कीम हे राज्य 16 मे 1975 रोजी भारताचा भाग बनले. राजेशाही संपल्यानंतर देशातील 22 वे राज्य बनले.

आता सिक्कीमला जाणाऱ्या लोकांना लवकरच रेल्वेने येथे येता येणार आहे. याआधी ही सुविधा येथे नव्हती. कारण येथील उंच उंच पर्वतांमुळे ते शक्य होत नाही. डोंगराळ भागात अनेक बोगदे बांधावे लागतात. हे काम तितके सोपे नाही. पण आता अखेर येथे रेल्वे पोहोचणार आहे.

राज्यातील पहिले रेल्वे स्टेशन

पर्यटनाच्या बाबतीत हे राज्य महत्त्वाचे आहे. सीमेवर हे राज्य असल्याने येथे रंगपो स्टेशन हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सिक्कीममध्ये कोणताही रेल्वे मार्ग नाही. पण आता सरकारने तीन टप्प्यांत येथे रेल्वे आणण्याची तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात सेवोक ते रंगपो रेल्वे प्रकल्प होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रांगपो ते गंगटोक आणि तिसऱ्या टप्प्यात गंगटोक ते नाथुला हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

ऑक्टोबर 2009 मध्ये शिवोक-रंगपो रेल्वे प्रकल्प सुरु झाला होता. आता येथे सिक्कीमचे पहिले रेल्वे स्टेशन बांधले जाणार आहे. या रेल्वे लाईन प्रकल्पाची लांबी सुमारे 45 किमी आहे जी पश्चिम बंगालमधील शिवोक ते सिक्कीममधील रंगपोला जोडते.

या मार्गावर एकूण पाच रेल्वे स्थानके असणार आहेत. ज्यामध्ये तीस्ता बाजार देखील असेल. तीस्ता बाजार हे भारतातील पहिले भूमिगत हॉल्ट स्टेशन असू शकते. या मार्गावरील उर्वरित चार ओपन क्रॉसिंग स्टेशन शिवोक, रेआंग, मेल्ली आणि रंगपो असतील.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!