AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Presidential Election : आपल्याला आमदार, खासदार कसे निवडले जातात हे माहित आहे; पण भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात हे माहित आहे का? जाणून घ्या कशी असते प्रक्रीया

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदार जेव्हाही मतदान करतात तेव्हा ते कोणत्याही एका व्यक्तीची निवड करत नाहीत, तर वेगवेगळ्या लोकांना प्राधान्य देतात. पहिल्या मतमोजणीत उमेदवाराला सर्वाधिक आणि निम्म्याहून अधिक मते मिळाल्यास, तो जिंकतो.

Presidential Election : आपल्याला आमदार, खासदार कसे निवडले जातात हे माहित आहे; पण भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात हे माहित आहे का? जाणून घ्या कशी असते प्रक्रीया
राष्ट्रपती भवनImage Credit source: tv9
aslam shanedivan
aslam shanedivan | Updated on: Jun 09, 2022 | 6:46 PM
Share

नवी दिल्ली : देशात सध्याच्या घडिला राज्यसभेच्या निवडणूकांचे (Rajya Sabha Election) बिगूल वाजले आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये यावरून रस्सी खेच होताना दिसत आहे. याचबरोबर देशात आळखीन एक निवडूण लागणार असून ती प्रतिष्ठेची आणि महत्वाची आहे. ती देशाच्या सर्वोच्च पदावरची राष्ट्रपदी पदाची (Presidential Election) आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) गुरुवारी राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. ज्यासाठी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रपतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र याआधी आम्ही tv9 आपल्याला भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात हे सांगणार आहोत. वास्तविक, राष्ट्रपतीची निवडणूक ही पंतप्रधान निवडीपेक्षा खूप वेगळी असते.

अशा परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला मत दिले आणि मते कशी मोजली जातात. याशिवाय प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य ठरवले जाते आणि त्या मूल्याच्या आधारे जय-पराजय ठरवला जातो. तर आज आपण हे देखील जाणून घेणार आहोत की मताचे मूल्य कसे ठरवले जाते आणि निवडणूक प्रक्रिया कशी पूर्ण होते.

कोण मतं देतं?

संसदेचे सदस्य आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात आणि मतदान करतात. परंतु, राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले खासदार यात भाग घेत नाहीत. अशा परिस्थितीत राज्यसभेचे 12 आणि लोकसभेचे 2 सदस्य त्यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे केवळ निर्वाचित खासदार किंवा थेट लोकांमधून निवडून आलेले खासदारच निवडणुकीत भाग घेतात. त्याचबरोबर या निवडणूकीत ज्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे, त्यांचे सदस्यांही सहभागी होता येत नाही.

मूल्य कसे कळते?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत स्वीकारलेल्या प्रमाणिक प्रतिनिधित्व पद्धतीनुसार प्रत्येक मताचे स्वतःचे मूल्य असते. खासदारांच्या मताचे मूल्य ठरलेले असते, परंतु आमदारांच्या मताचे मूल्य वेगवेगळ्या राज्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील आमदाराच्या मताचे मूल्य 208 आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या राज्य सिक्कीमच्या

मताचे मूल्य फक्त 7 आहे.

प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 आहे.

भारतात सध्या 776 खासदार आहेत. 543 लोकसभा खासदार आणि 233 राज्यसभा खासदार.

एकूण ७७६ खासदारांच्या मतांचे मूल्य – 5,49,408 (सुमारे साडेपाच लाख)

भारतातील आमदारांची संख्या 4120 आहे. या सर्व आमदारांचे एकत्रित मत 5,49,474 (सुमारे साडेपाच लाख) आहे.

अशा प्रकारे राष्ट्रपती निवडणुकीतील एकूण मते – 10,98,882 (अंदाजे 11 लाख)

मताचे मूल्य भागातील लोकसंख्येच्या क्षेत्रफळावर

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फक्त एकाच व्यक्तीचे मत मोजले जाईल असे नाही. उलट त्यांच्या मताचे मूल्य त्यांच्या भागातील लोकसंख्येच्या क्षेत्रफळावर मोजले जाते.

आमदारांचे मताचे मूल्य कसे ठरवले जाते?

आमदाराच्या मताचे मूल्य काढण्यासाठी, त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येतील आमदाराचा वाटा दिला जाईल आणि नंतर तो 1000 ने भागला जाईल. यानंतर येणारा आकडा हा त्या राज्याचे मत मूल्य असेल. तो त्या आमदाराच्या मताचे मूल्य असेल.

खासदाराच्या मताचे मूल्य

खासदाराच्या मताचे मूल्य कसे मोजले जाते ते आता जाणून घेऊ. त्याच वेळी, खासदाराच्या मताचे मूल्य सर्व राज्यांच्या आमदारांच्या मतांच्या एकूण मूल्यामध्ये संसद सदस्यांच्या वाट्याला दिले जाईल. यानंतर येणारा आकडा हा खासदाराच्या मताचे मूल्य असेल. कृपया लक्षात घ्या की हे मूल्य प्रत्येक वेळी बदलते.

कसा ठरवला जातो विजय

प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचे मूल्य मोजल्यानंतर, खासदार आणि आमदार हे मत देतात. यानंतर आमदार-खासदारांच्या संख्येऐवजी त्यांच्या मतांचे मूल्य मोजले जाते. या मत मूल्यांमध्ये जो उमेदवार प्रथम कोटा मिळवेल तो विजयी मानला जाईल. पण, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतमोजणीही नेहमीच्या पद्धतीने होत नसून त्याचा वेगळा पॅटर्न आहे. मतमोजणी वेगळ्या पद्धतीच्या आधारे केली जाते.

कशी होती मतांची ​​मोजणी? नमुना काय आहे?

मतमोजणीच्या पद्धतीबद्दल बोलायचे झाले तर, विविध राज्यांत निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथम मतपेटी विमानातून संसदेत आणली जाते. येथे मतांची मोजणी केली जाते. यानंतर, त्यांच्या नावाच्या आधारे राज्यांच्या मतपेट्या उघडल्या जातात. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यात मतमोजणी केली जाते. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खासदार आणि आमदारांची निम्म्याहून अधिक मते मिळवावी लागतात. यामध्येही कोटा आधी मिळवावा लागतो.

विजयाची हमी कशी दिली जाते?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदार जेव्हाही मतदान करतात तेव्हा ते कोणत्याही एका व्यक्तीची निवड करत नाहीत, तर वेगवेगळ्या लोकांना प्राधान्य देतात. पहिल्या मतमोजणीत उमेदवाराला सर्वाधिक आणि निम्म्याहून अधिक मते मिळाल्यास, तो जिंकतो. निम्म्याहून अधिक मते न मिळाल्यास, पुनर्मोजणी केली जाते. तर पहिल्या फेरीत सर्वात कमी मते मिळविणारा उमेदवार हा बाद ठरवला जातो. त्यानंतर मिळालेली मते विचारात घेऊन इतर उमेदवारांच्या वाट्याला जोडली जातात. मग ही प्रक्रिया चालू राहते आणि जेव्हा पहिले मत ठराविक मत मूल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा तो विजेता मानला जातो.

Follow Us
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण