Presidential Election : आपल्याला आमदार, खासदार कसे निवडले जातात हे माहित आहे; पण भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात हे माहित आहे का? जाणून घ्या कशी असते प्रक्रीया

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदार जेव्हाही मतदान करतात तेव्हा ते कोणत्याही एका व्यक्तीची निवड करत नाहीत, तर वेगवेगळ्या लोकांना प्राधान्य देतात. पहिल्या मतमोजणीत उमेदवाराला सर्वाधिक आणि निम्म्याहून अधिक मते मिळाल्यास, तो जिंकतो.

Presidential Election : आपल्याला आमदार, खासदार कसे निवडले जातात हे माहित आहे; पण भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात हे माहित आहे का? जाणून घ्या कशी असते प्रक्रीया
राष्ट्रपती भवनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 6:46 PM

नवी दिल्ली : देशात सध्याच्या घडिला राज्यसभेच्या निवडणूकांचे (Rajya Sabha Election) बिगूल वाजले आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये यावरून रस्सी खेच होताना दिसत आहे. याचबरोबर देशात आळखीन एक निवडूण लागणार असून ती प्रतिष्ठेची आणि महत्वाची आहे. ती देशाच्या सर्वोच्च पदावरची राष्ट्रपदी पदाची (Presidential Election) आहे. निवडणूक आयोगाकडून (Election Commission) गुरुवारी राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. ज्यासाठी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रपतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र याआधी आम्ही tv9 आपल्याला भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात हे सांगणार आहोत. वास्तविक, राष्ट्रपतीची निवडणूक ही पंतप्रधान निवडीपेक्षा खूप वेगळी असते.

अशा परिस्थितीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला मत दिले आणि मते कशी मोजली जातात. याशिवाय प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य ठरवले जाते आणि त्या मूल्याच्या आधारे जय-पराजय ठरवला जातो. तर आज आपण हे देखील जाणून घेणार आहोत की मताचे मूल्य कसे ठरवले जाते आणि निवडणूक प्रक्रिया कशी पूर्ण होते.

कोण मतं देतं?

संसदेचे सदस्य आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात आणि मतदान करतात. परंतु, राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले खासदार यात भाग घेत नाहीत. अशा परिस्थितीत राज्यसभेचे 12 आणि लोकसभेचे 2 सदस्य त्यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे केवळ निर्वाचित खासदार किंवा थेट लोकांमधून निवडून आलेले खासदारच निवडणुकीत भाग घेतात. त्याचबरोबर या निवडणूकीत ज्या राज्यांमध्ये विधानपरिषद आहे, त्यांचे सदस्यांही सहभागी होता येत नाही.

हे सुद्धा वाचा

मूल्य कसे कळते?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत स्वीकारलेल्या प्रमाणिक प्रतिनिधित्व पद्धतीनुसार प्रत्येक मताचे स्वतःचे मूल्य असते. खासदारांच्या मताचे मूल्य ठरलेले असते, परंतु आमदारांच्या मताचे मूल्य वेगवेगळ्या राज्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील आमदाराच्या मताचे मूल्य 208 आहे, तर सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या राज्य सिक्कीमच्या

मताचे मूल्य फक्त 7 आहे.

प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 आहे.

भारतात सध्या 776 खासदार आहेत. 543 लोकसभा खासदार आणि 233 राज्यसभा खासदार.

एकूण ७७६ खासदारांच्या मतांचे मूल्य – 5,49,408 (सुमारे साडेपाच लाख)

भारतातील आमदारांची संख्या 4120 आहे. या सर्व आमदारांचे एकत्रित मत 5,49,474 (सुमारे साडेपाच लाख) आहे.

अशा प्रकारे राष्ट्रपती निवडणुकीतील एकूण मते – 10,98,882 (अंदाजे 11 लाख)

मताचे मूल्य भागातील लोकसंख्येच्या क्षेत्रफळावर

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फक्त एकाच व्यक्तीचे मत मोजले जाईल असे नाही. उलट त्यांच्या मताचे मूल्य त्यांच्या भागातील लोकसंख्येच्या क्षेत्रफळावर मोजले जाते.

आमदारांचे मताचे मूल्य कसे ठरवले जाते?

आमदाराच्या मताचे मूल्य काढण्यासाठी, त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येतील आमदाराचा वाटा दिला जाईल आणि नंतर तो 1000 ने भागला जाईल. यानंतर येणारा आकडा हा त्या राज्याचे मत मूल्य असेल. तो त्या आमदाराच्या मताचे मूल्य असेल.

खासदाराच्या मताचे मूल्य

खासदाराच्या मताचे मूल्य कसे मोजले जाते ते आता जाणून घेऊ. त्याच वेळी, खासदाराच्या मताचे मूल्य सर्व राज्यांच्या आमदारांच्या मतांच्या एकूण मूल्यामध्ये संसद सदस्यांच्या वाट्याला दिले जाईल. यानंतर येणारा आकडा हा खासदाराच्या मताचे मूल्य असेल. कृपया लक्षात घ्या की हे मूल्य प्रत्येक वेळी बदलते.

कसा ठरवला जातो विजय

प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताचे मूल्य मोजल्यानंतर, खासदार आणि आमदार हे मत देतात. यानंतर आमदार-खासदारांच्या संख्येऐवजी त्यांच्या मतांचे मूल्य मोजले जाते. या मत मूल्यांमध्ये जो उमेदवार प्रथम कोटा मिळवेल तो विजयी मानला जाईल. पण, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतमोजणीही नेहमीच्या पद्धतीने होत नसून त्याचा वेगळा पॅटर्न आहे. मतमोजणी वेगळ्या पद्धतीच्या आधारे केली जाते.

कशी होती मतांची ​​मोजणी? नमुना काय आहे?

मतमोजणीच्या पद्धतीबद्दल बोलायचे झाले तर, विविध राज्यांत निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथम मतपेटी विमानातून संसदेत आणली जाते. येथे मतांची मोजणी केली जाते. यानंतर, त्यांच्या नावाच्या आधारे राज्यांच्या मतपेट्या उघडल्या जातात. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यात मतमोजणी केली जाते. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी खासदार आणि आमदारांची निम्म्याहून अधिक मते मिळवावी लागतात. यामध्येही कोटा आधी मिळवावा लागतो.

विजयाची हमी कशी दिली जाते?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदार आणि आमदार जेव्हाही मतदान करतात तेव्हा ते कोणत्याही एका व्यक्तीची निवड करत नाहीत, तर वेगवेगळ्या लोकांना प्राधान्य देतात. पहिल्या मतमोजणीत उमेदवाराला सर्वाधिक आणि निम्म्याहून अधिक मते मिळाल्यास, तो जिंकतो. निम्म्याहून अधिक मते न मिळाल्यास, पुनर्मोजणी केली जाते. तर पहिल्या फेरीत सर्वात कमी मते मिळविणारा उमेदवार हा बाद ठरवला जातो. त्यानंतर मिळालेली मते विचारात घेऊन इतर उमेदवारांच्या वाट्याला जोडली जातात. मग ही प्रक्रिया चालू राहते आणि जेव्हा पहिले मत ठराविक मत मूल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा तो विजेता मानला जातो.

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.