AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी है तो मुमकीन है! सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांचे आभार मानले

पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे. या निकालानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

मोदी है तो मुमकीन है! सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांचे आभार मानले
| Edited By: | Updated on: Jul 17, 2019 | 7:06 PM
Share

हेग, नेदरलँड : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिलाय. न्यायमूर्तींनी 15 विरुद्ध 1 अशा मताने निर्णय दिला. यातील केवळ एका न्यायमूर्तींनी विरोधात मतं दिलं. हे न्यायमूर्ती पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही आयसीजेने मान्य केलंय. त्यामुळे भारतासाठी पुढील मार्ग आता सोपा झाला आहे. या निकालानंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कोणताही खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर नेणं हे धाडसाचं पाऊल समजलं जातं. भारताने कुलभूषण जाधव यांच्यासाठी आयसीजेमध्ये धाव घेतली आणि दिग्गज वकील हरिश साळवे यांच्यामार्फत बाजू मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याची बाजू भारताने लावून धरली होती. याच मुद्द्यावर भारताने विजय मिळवला. आयसीजेमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सुषमा स्वराज यांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींसोबतच सुषमा स्वराज यांनी हरिश साळवे यांचंही अभिनंदन केलंय. हरिश साळवे यांनी पाकिस्तानचा प्रत्येक युक्तीवाद खोडून काढत प्रभावीपणे बाजू मांडली होती. त्यामुळेच भारताचा हा विजय झाला. या निकालामुळे कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल, असं सुषमा स्वराज यांनी म्हटलंय.

सुषमा स्वराज यांचे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न

परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला 16 पत्र लिहून कुलभूषण जाधव यांच्यासाठी कौन्सिलर एक्सिसची मागणी केली होती. पण पाकिस्तानने एकाही पत्राला उत्तर दिलं नाही. शिवाय कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी यांची भेट घालून देण्याचं महत्त्वाचं काम सुषमा स्वराज यांनी केलं होतं. या प्रत्येक घडामोडीवर स्वतः लक्ष ठेवून भारताकडून हा मुद्दा प्रभावीपणे कसा लावून धरला जाईल यासाठी सुषमा स्वराज यांनी प्रयत्न केले.

आता पुढे काय?

पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाल्यामुळे भारतासाठी आता पुढील मार्ग सोपा झालाय. कारण, पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या फाशीवर आयसीजेने स्थगिती कायम ठेवली आहे. कौन्सिलर एक्सेस दिल्यानंतरच या फाशीवर पुनर्विचार केला जाईल, असं कोर्टाने स्पष्ट केलंय. त्यामुळे भारताला आता राजनैतिक मदत करत हा खटला लढवता येईल.

फाशीला स्थगिती

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा नकार दिल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे 18 मे 2017 रोजी कोर्टाने फाशीला स्थगिती दिली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.