AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फलकनुमा एक्सप्रेसच्या तीन बोगींना भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारल्या, सुदैवाने कोणीही जीवितहानी नाही

बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतू यासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे उघडकीस येत आहे.

फलकनुमा एक्सप्रेसच्या तीन बोगींना भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारल्या, सुदैवाने कोणीही जीवितहानी नाही
falaknuma expressImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 08, 2023 | 12:37 PM
Share

नवी दिल्ली : तेलंगणा राज्यात चालत्या ट्रेनच्या बोगीना आग लागल्याची घटना घडली आहे. फलकनुमा एक्सप्रेसच्या तीन बोगींना आग लागल्याने प्रवाशांनी वाट दिसेल तेथून डब्यांच्या बाहेर उड्या मारीत आपले प्राण वाचविले आहेत. यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त आहे. बलासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे अपघाताची मालीका थांबण्याचे नावच घेत नसल्याचे उघडकीस आले आहे.

यासंदर्भात वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तानूसार तेलंगणाच्या पागिदिपल्ली – बोम्माईपल्ली दरम्यान चालत्या फलकनुमा एक्सप्रेसला अचानक आग लागली. या आगीची सुरुवात S – 4 बोगीतून झाली. आगीमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत सुरक्षा चेन खेचली त्यामुळे गाडी थांबली. त्यामुळे प्रवाशांनी वाट दिसेल तेथून जीवाच्या आकांताने उड्या मारीत आपले प्राण वाचविले. या दरम्यान प्राथमिक माहितीनूसार या ट्रेनच्या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

हे पाहा ट्वीट –

ओदिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकादरम्यान 2 जून रोजी झालेल्या कोरामंडळ एक्सप्रेसच्या विचित्र अपघातानंतर अपघाताची मालिकाच सुरु आहे. बालासोर ट्रेन अपघातात सुमारे तीनशे जणांचा मृत्यू तर 1100 जण जखमी झाले होते. यानंतर या अपघाताची सीबीआय चौकशी सरु करण्यात आली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतू यासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे उघडकीस येत आहे. आणि वारंवार रेल्वे अपघातांना सोमोरे जावे लागत आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.