AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची मोठी कारवाई

लष्कर व सीआरपीएफच्या संयुक्त पथकातील जवानांनी ही कारवाई केली. परिसरात नाकाबंदी केल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला होता. त्याला सुरक्षा दलांनी सडेतोड उत्तर दिले. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची मोठी कारवाई
कुपवाडामध्ये अंमली पदार्थ आणि आयईडीसह 3 संशयितांना अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 10, 2022 | 10:52 PM
Share

श्रीनगर : मागील काही महिन्यांपासून दहशतवाद्यांनी काश्मिर खोर्‍यात पुन्हा डोके वर काढले आहे. हे दहशतवादी (Terrorist) अधूनमधून सुरक्षा दलांना टार्गेट करीत आहेत. त्यांच्याकडून हल्ल्यांचे सत्र सुरू असताना त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सुरक्षा दलां (Security Force)नीही विशेष मोहिम (Special Campaign) हाती घेतली आहे. आज काश्मिर खोर्‍यात दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये तुफान धुमश्चक्री उडाली. या चकमकीत लष्कर-ए-तोएबाशी दोन दहशतवाद्यांसह तिघांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. पुलवामा आणि श्रीनगरमध्ये या दोन चकमकी उडाल्या. सुरक्षा दलांच्या धडक कारवायांनी दहशतवाद्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. (Three terrorists killed in Kashmir Valley; Major action by security forces)

सुरक्षा दलांचे जंगल परिसरात सर्च ऑपरेशन

पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त खबर मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी आज सकाळपासूनच संपूर्ण जंगल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यादरम्यान नैना बाटपोरा येथे पहिली चकमक झाली. यात दोन दहशतवादी मारले गेले. लष्कर व सीआरपीएफच्या संयुक्त पथकातील जवानांनी ही कारवाई केली. परिसरात नाकाबंदी केल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला होता. त्याला सुरक्षा दलांनी सडेतोड उत्तर दिले. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडील दारुगोळा आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

श्रीनगरमध्ये एकाचा खात्मा; दोघे पळून गेले

एकीकडे पुलवामा जिल्ह्यात सुरू असतानाच दुसरीकडे श्रीनगरच्या हजरतबल भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात यश आले. यादरम्यान दोन दहशतवादी पळून गेले. त्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मिर पोलिस दलातील एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी काश्मिर खोर्‍यात हल्ले सुरू ठेवले आहेत. बुधवारीही उधमपूरमध्ये भीषण स्फोट झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. याचदरम्यान श्रीनगरमधील एका गावच्या सरपंचाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. (Three terrorists killed in Kashmir Valley; Major action by security forces)

इतर बातम्या

Delhi Crime : आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग पट्ट्याने मारहाण, दिल्लीतील धक्कादायक घटना

Ratnagiri Accident : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळासह महिलेचा मृत्यू

Follow Us
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही
नागपूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्याची शक्यता; OTP शिवाय सिलेंडर नाही.
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.