AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहकारी जवानांच्या ‘त्या’ कृत्याला कंटाळून जवानानेच केली हत्या, सांगितला संपूर्ण घटनाक्रम

तोफखाना युनिटचा गनर देसाई मोहन याने पोलिसांसमोर इन्सास रायफल चोरून तिच्या सहाय्याने आपल्या 4 सहकारी सैनिकांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

सहकारी जवानांच्या 'त्या' कृत्याला कंटाळून जवानानेच केली हत्या, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 17, 2023 | 5:38 PM
Share

पंजाब : पंजाबमधील भटिंडा मिलिटरी स्टेशनवर 12 एप्रिलला झालेल्या रॅपिड फायरिंगमध्ये चार जवानांना प्राण गमवावे लागले. प्राथमिक माहितीमधून हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीतून हा दहशतवादी हल्ला नव्हता तर येथील एका जवानाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्या जवानाने आपल्या कृत्याची कबुली दिली असून त्याने संपूर्ण घटनाक्रमही सांगितला आहे. देसाई मोहन असे या जवानाचे नाव आहे. तो तोफखाना युनिटचा गनर आहे.

लष्कराने याबाबत माहिती देताना सांगितले की, सतत चौकशी केल्यानंतर तोफखाना युनिटचा गनर देसाई मोहन याने पोलिसांसमोर इन्सास रायफल चोरून तिच्या सहाय्याने आपल्या 4 सहकारी सैनिकांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

देसाई मोहन याने 9 एप्रिल 2023 रोजी सकाळी भरलेल्या मॅगझिनसह रायफल चोरून ती एका ठिकाणी लपवली. 12 एप्रिल रोजी पहाटे साडे चारच्या सुमारास त्याने चोरलेली रायफल लपवलेल्या ठिकाणाहून कडून पहिल्या मजल्यावर नेली. तेथे झोपेत असलेल्या चार जवानांवर ती रायफल चालवून त्यांची हत्या केली. त्या रात्री तोफखाना देसाई मोहन सेन्ट्री ड्युटीवर होता, असे लष्कराने सांगितले.

देसाई मोहन याने गुन्हा केल्यानंतर रायफल आणि सात गोळ्या कँटोन्मेंटमध्ये असलेल्या गटाराच्या खड्ड्यात फेकल्या. देसाई मोहन याने रायफल, मॅगझीन आणि एलएमजीच्या आठ राउंड चोरून या गुन्ह्यात त्याचा वापर केला होता.

हत्येचे कारण काय ?

आरोपी देसाई मोहन याने ज्या चार जवानांची हत्या केली त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्याला अनैसर्गिक अत्याचार करून त्याची मानसिक आणि शारीरिक छळवणूक केली होती. त्यामुळे आतून सुडाने पेटलेल्या देसाई मोहन याने त्यांचा बदला घेण्यासाठीच त्या चार जणांची हत्या केली.

दहशतवादी हल्ला नाही

या घटनेनंतर प्राथमिक एफआयआर नोंदवताना 12 एप्रिल रोजी आरोपीने तपास यंत्रणांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने साध्या वेशातील दोन व्यक्ती इंसास रायफल आणि कुऱ्हाडी घेऊन आत घुसले होते अशी माहिती दिली होती. त्यामुळे हा दहशतवादी हा हल्ला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येत होती,

पोलिसांना संशय काय ?

देसाई मोहन यांची चौकशी करता असताना त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपास करण्यात आला. सध्या वेशातील दोन व्यक्ती आत घुसून फायरींग करताना त्यांना कुणीच पाहिले नाही. तसेच, त्याला देसाई यांने प्रतिकार का केला नाही असे प्रश्न विचारल्यावर देसाई गोंधळला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची माहिती दिली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.