AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! प्रवास केला नसताना फास्टॅगमधून 1.55 लाख जणांचा कापला गेला टोल

toll plaza Fastag | तुमच्याकडे गाडी असेल तर ही बातमी महत्वाची आहे. टोल प्लॉझासंदर्भात वर्षभरात कोणकोणत्या तक्रारी आल्या, त्याचा अहवाल जारी करण्यात आला आहे. तसेच ज्या लोकांनी तक्रारी केल्या नाहीत, त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

सावधान! प्रवास केला नसताना फास्टॅगमधून 1.55 लाख जणांचा कापला गेला टोल
somatane toll plazaImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 01, 2024 | 11:00 AM
Share

नवी दिल्ली, दि. 1 जानेवारी 2024 | देशातील महामार्ग आणि राज्य महामार्गांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल कापण्याची सुविधा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिॉनिक टोल कलेक्शन सिस्टम (ईटीसी) प्रणालीने हा टोल कापला जात आहे. परंतु ही फास्टॅग प्रणाली अनेकांसाठी अडचणीची ठरत आहे. प्रवास न करताना लाखो जणांचा टोल कापला गेला आहे. तसेच जास्त टोलही गेल्याची लाखो तक्रारी हेल्पलाइन नंबर १०३३ वर झाल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात या तक्रारीचा डाटा समोर आला आहे. फास्टॅगसंदर्भात वर्षभरात साडेआठ लाख तक्रारी आल्या आहेत. म्हणजेच रोज २४०० तक्रारी आल्या आहेत.

काय आहे अहवालात

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया अंतर्गत असलेली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रबंधन कंपनी लिमिटेडने २०२२-२३ चा अहवाल जारी केला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील टोलसंदर्भात तक्रारी आणि सुविधांसाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली. हेल्पलाईन क्रमांकावर आठ लाख ६६ हजार तक्रारी आल्या आहेत. त्यातील १ लाख ५५ हजार ६५७ जणांनी आपण प्रवास केला नसताना टोल कापला गेल्याचे म्हटले आहे. तसेच १ लाख २६ हजार ८५० जणांनी फास्टॅगच्या माध्यमातून जास्त टोल कापला गेल्याची तक्रार आहे.

फास्टॅग असतानाही आली अडचण

फास्टॅगसंदर्भात आणखी एक वेगळी तक्रार लाखो लोकांनी केली आहे. १ लाख ६८ हजार जणांनी फास्टॅग असताना टोल प्लाझा बॅरियरने जाऊ दिले नाही, अशी तक्रार केली आहे. तसेच ३५ हजार ५८० जणांनी बँकेत पुरेशी रक्कम असताना रक्कम नसल्याचे दाखवले गेले आहे. दरम्यान आलेल्या शंभर टक्के तक्रारी सोडवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. फास्टॅग नसताना दुप्पट दंड आकारला जाण्याची तरतूद आहे. तसेच फास्टॅग असताना बॅरियर पार करता येत नसल्यास फास्टॅग नाही, असे समजले जाते. या परिस्थितीत दुप्पट टोल द्यावा लागतो. यामुळे आपले खाते नियमित तपासणे आवश्यक आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली