AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toll Tax: भारतातील ‘या’लोकांना टोल टॅक्स माफ, वाचा संपूर्ण यादी

आपल्या देशात असे काही लोक आहेत, ज्यांना टोल भरावा लागत नाही. हे लोक नेमके कोण आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Toll Tax: भारतातील 'या'लोकांना टोल टॅक्स माफ, वाचा संपूर्ण यादी
Free Toll fot this people
| Updated on: Jun 21, 2025 | 6:53 PM
Share

देशातील प्रत्येक महामार्गावर आपल्याला टोल प्लाझा आढळतो. टोलमधून मिळणारा महसूल हा भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देतो. टोलमधून मिळणारा पैसा महामार्गावरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि मार्गाच्या देखभालीसाठी वापरला जातो. अलिकडच्या काळात टोल वसुलीत पारदर्शकता येण्यासाछी आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यानुसार सर्वत्र ऑनलाईन टोल आकारला जातो.

रस्त्यावरील प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाकडून टोल वसूल केला जातो. NHAI ने असे जाहीर केले आहे की रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व व्यक्तींकडून समान टोल आकारला जाईल. मात्र तरीही देशात असे काही लोक आहेत, ज्यांना टोल भरावा लागत नाही. हे लोक नेमके कोण आहेत? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुढील लोकांकडून टोल आकारला जात नाही

  • भारताचे राष्ट्रपती
  • भारताचे उपराष्ट्रपत
  • भारताचे पंतप्रधान
  • सरन्यायाधीश
  • लोकसभेचे अध्यक्ष
  • राज्यांचे राज्यपाल
  • राज्यांचे मुख्यमंत्री
  • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
  • संसद सदस्य (खासदार)
  • राज्यांच्या विधान परिषदांचे सदस्य
  • विधानसभा सदस्य (आमदार) ( स्थानिक नेत्यांना फक्त राज्यातच सूट मिळते.)
  • भारत सरकारचे सचिव
  • लोकसभेचे सचिव
  • राज्यसभेचे सचिव
  • लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख
  • कमांड क्षेत्रांचे कमांडर
  • राज्यांचे मुख्य सचिव
  • राज्य विधानसभा/विधान परिषदेचे सचिव
  • संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी जे गणवेशात ड्युटीवर जातात आणि येतात
  • पोलिस विभागाचे अधिकारी जे गणवेशात ड्युटीवर जातात आणि येतात

आपत्कालीन सेवा

आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट दिली जाते. यात रुग्णवाहिका, अग्निशमन दल, शववाहिका यांचा समावेश आहे. तसेच काही राज्यांमध्ये मान्यताप्राप्त पत्रकारांनाही सूट दिली जाते. त्याचबरोबर दुचाकी वाहनांनाही टोलमाफी मिळते.

फास्टटॅग वार्षिक पास

वाहनधारकांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, सरकार खाजगी वाहनांसाठी फास्टॅगचा वार्षिक पास जारी करेल, ज्याची किंमत 3000 रुपये असेल. ही पास प्रणाली 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. या पासद्वारे खाजगी वाहन मालकांना राष्ट्रीय महामार्गांवर कमी खर्चात आणि त्रासमुक्त प्रवास करता येणार आहे. हा पास असणाऱ्या वाहन चालकांना वर्षातून जास्तीत जास्त 200 वेळा टोल पास करता येणार आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत