AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची मोठी खेळी… छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी ‘या’ नेत्याची निवड; 32 टक्क्यांचा खेळ लोकसभेत साधणार?

छत्तीसगडच्या विधानसभा निडवणुकीचे निकाल लागल्यानंतर तब्बल आठ दिवसानंतर भाजपने राज्यातील नव्या मुख्यमंत्र्याची निवड केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री कोण होणार यावर माथापच्ची सुरू होती. सस्पेन्स ठेवला गेला होता. पण आता हा सस्पेन्स दूर झाला आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी भाजपने विष्णूदेव साय यांची निवड केली आहे. विधीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

भाजपची मोठी खेळी... छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी 'या' नेत्याची निवड; 32 टक्क्यांचा खेळ लोकसभेत साधणार?
vishnudeo saiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 10, 2023 | 4:49 PM
Share

रायपूर | 10 डिसेंबर 2023 : तब्बल आठ दिवसाच्या माथापच्चीनंतर अखेर भाजपने छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री निवडला आहे. विष्णूदेव साय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपचने साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. विधीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात साय यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. साय यांच्या माध्यमातून भाजपने मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा आहे. राज्यात 32 टक्के आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजच राज्यातील सत्ता कुणाच्या हाती असेल हे ठरवत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साय यांची निवड करून भाजपने मोठी खेळी खेळल्याचं सांगितलं जात आहे.

विष्णऊदेव साय हे छत्तीसडच्या कुनकुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या 32 टक्के आहे. साय हे सुद्धा आदिवासी समाजातून येतात. अजित जोगी यांच्यानंतर राज्यात एकही आदिवासी मुख्यमंत्री झाला नव्हता. आता साय यांच्या निमित्ताने राज्याला पुन्हा एकदा आदिवासी मुख्यमंत्री मिळाला आहे. विष्णूदेव साय हे 2000मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. निवडणूक काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात आम्हाला सत्ता द्या, विष्णूदेव साय यांना मी मोठा नेता बनवेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार साय यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

मोठी खेळी

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. राज्यात आदिवासी समाज 32 टक्के आहे. हा समाज आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपने साय यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. साय यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिल्याने राज्यातील आदिवासी समाज भाजपच्या बाजूने येईलच, शिवाय देशभरातील आदिवासींनाही आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

चार राज्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी आदिवासी, ओबीसी आणि महिला वर्ग या तीन वर्गाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं होतं, त्याचाच एक भाग म्हणून साय यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद सोपवलं गेलं असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सरपंच ते मुख्यमंत्री

विष्णूदेव साय हे संघाच्या अत्यंत जवळचे आहेत. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याही ते अत्यंत जवळचे होते. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांचं केंद्रात पहिल्यांदा सरकार आलं. तेव्हा साय यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. साय यांची सुरुवात सरपंच पदापासून झाली होती. सरपंच ते मुख्यमंत्री हा साय यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.