AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान, अखेर ती गोष्ट केलीच मान्य..

अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. याबाबतचा व्हिडीओ पुढे आला. यावरच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मोठे विधान केले. त्यांनी काही गोष्टी देखील मान्य केल्या.

अरुणाचलमधील चीनच्या हालचालींवर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान, अखेर ती गोष्ट केलीच मान्य..
China India border Arunachal Pradesh
| Updated on: Aug 20, 2026 | 2:48 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचा दावा केला जात आहे. 60 किलोमीटरपर्यंत चीनने भारतात घुसखोरी केल्याचेही सांगितले जाते. त्यातच आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारत चीन सीमेवरबद्दल मोठे विधान केले. त्यांनी मान्य केले आहे की, अरुणाचल प्रदेशातील भारत तणाव आहे. त्यांनी म्हटले की, अरुणाचल प्रदेशाच्या काही गावांतील लोकांना बॉर्डरवर समस्या होत आहेत. पण त्याचे कारण आहे की, सीमेचे योग्य प्रकारे सीमांकन करण्यात आलेले नाही. हा पण त्यांनी हे देखील मान्य 60 किलोमीटरपर्यंत चीनने घुसखोरी केली हे देखील म्हणणे चुकीचे आहे. किरेन रिजिजू हे पश्चिम अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम लोकसभा सीटवरून निवडून आलेत. अरुणाचल प्रदेशाच्या पश्चिममध्ये तवांग, पश्चिम कामेंग, पूर्वी कामेंग, सुबनसिरी या जिल्ह्यांता समावेश आहे. किरेन रिजिजू यांना सीमा वादावर स्पष्ट मत मांडले.

जर कोणी 60 किलोमीटरच्या घुसखोरीबद्दल बोलत असेल तर हे चुकीचे आहे. ज्यामुळे लष्कराचे मनोबल कमी होऊ शकते. भारत चीन यांच्यात अरुणाचल प्रदेशामध्ये मोठी सीमा आहे. त्याला अजून सीमांकन करण्यात आलेले नाही. तिथे सीमेवर बॉर्डर पिलर नाहीत. जमिनीवर बॉर्डर डिफाइन केलेले नाही. सीमेवर समस्या आहे, बॉर्डरजवळील आपल्या गावातील लोकांनी जी चिंता व्यक्त केली, ती अतिशय योग्य आहे.

कारण सीमा या सीमांकन करण्यात आलेल्या नाहीत. उंच ठिकाणी गाव नसते. गावखाली असते, घाटीमध्ये असते. मुळात म्हणजे भारत आणि चीन यांच्यात सीमांकन झाले नसल्याने टेन्शन असतेच. भारत आणि चीनच्या वादावर बोलताना त्यांनी म्हटले की, मान्य आहे की, सीमा भागात चीनने रस्ते बनवली आहेत. त्यांनी हायवे तयार केला, अजून काही सुविधा वाढवल्या जात आहेत.

त्यावेळी भारताने निर्णय घेतला होता की, तिथे रस्ता तयार केला जाणार नाही. काँग्रेसच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री अँटोनी यांनी संसदेत हे विधान केले होते की, अरुणाचल प्रदेशाच्या सीमा भागात रस्ते तयार करणार नाही. भारत सरकारचा हा निर्णय होता. पण चीनने रस्ते तयार केले. चीनकडून बॉर्डरवर रस्ते तयार केली जात असतील किंवा अगोदर त्यांच्याकडून कब्जा केला जात असेल तर आपणही तसे करू शकतो.

पण त्याचा असा अर्थ होत नाही की, ते आपल्या गावावर कब्जा करत आहेत. आपल्या लोकांचे म्हणणे आहे की, आपली जमिन पुढेपर्यंत आहे. जे चायनिज लोक आहेत, सीमा भागातील त्यांचेही म्हणणे आहे की, आमचीही जागा पुढेपर्यंत आहे. भारत अरुणाचल प्रदेशला आपला महत्वाचा हिस्सा मानतो. भारत आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात 1126 किलोमीटर सीमा आहे.

Follow Us
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?