AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या काही जमिनींवर त्यांची नजर… चीन भारतात घुसला? विरोधकांच्या आरोपानंतर सरकारचे थेट उत्तर

China-Arunachal Pradesh: सीमावर्ती राज्यातील अनेक गावातील रहिवाशांनी चिंता व्यक्त करणे सहाजिक असल्याचे कॅबिनेट मंत्री किरेन रिजीजू म्हणाले. तर विरोधकांनी, चीन भारताच्या हद्दीत घुसल्याचा जो दावा केला आहे, त्यावरही रिजीजू यांनी मौन सोडले आहे.

भारताच्या काही जमिनींवर त्यांची नजर... चीन भारतात घुसला? विरोधकांच्या आरोपानंतर सरकारचे थेट उत्तर
चीन, अरुणाचल प्रदेश, किरेन रिजीजूImage Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 19, 2026 | 6:30 PM
Share

अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात चीन आत घुसल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा दावा कॅबिनेट मंत्री किरेन रिजीजू यांनी सपशेल खोटा असल्याचे म्हटले. जे लोक चीन भारतीय भूमीत 60 किमी आत घुसल्याचा दावा करत आहेत, ते आम्हाला बदनाम करण्यासाठी विविध व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. पण हे सर्व तथ्यहीन आहे. या दाव्यात काहीच दम नसल्याचे रिजीजू म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांची चिंता सहाजिक आहे. कारण अनेक ठिकाणी सीमा निश्चितीबाबत निर्णय झालेला नाही.

काही जमिनींवर त्यांची नजर, कारण सीमा निश्चित नाहीत

भारतीय जमिनींवर त्यांची नजर आहे. पण याचा अर्थ असा नाही की चीनने भारतीय वस्त्या, गावं ताब्यात घेतली. अनेक ठिकाणी सीमा निश्चित नसल्याने चीन त्या भागावर त्यांचा दावा करत आहे. पण याचा अर्थ असा कसा होईल की, चीन थेट आपल्या हद्दीत येईल आणि गावांवर कब्जा सांगेल? केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री रिजीजू यांनी याविषयी संयत आणि आणि स्पष्ट भूमिका जाहीर केली.

आपला भूभाग समोरपर्यंत आहे. तर तिबेटमधील काही गावातील लोकांचा दावा आहे की त्यांची शेती दूरपर्यंत आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती आहे. पण त्यावरून चीन भारतात 60 किलोमीटर आत घुसला हा दावा करणे चुकीचे असल्याचे रिजीजू म्हणाले. बांगलादेशाच्या सीमावर्ती भागातही असाच दावा करण्यात येतो. असेच फोटो शेअर करण्यात येतात. ही सर्व माहिती साफ खोटी आहे. वास्तविकतेशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही. चीन भारतात 60 किलोमीटर आत घुसल्याची चुकीची माहिती दिल्याने तिथल्या भारतीय सैनिकांच्या मनोबलावर परिणाम होत असल्याचे रिजीजू म्हणाले. देशातही या चुकीच्या माहितीमुळे संभ्रम तयार होत असल्याचा दावा त्यांनी केला.

सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था मजबूत

भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. भारत आणि तिबेट सीमा पोलिसांनी (ITBP) अरूणाचल प्रदेश आणि इतर सीमावर्ती भागात गस्त वाढवण्यात आल्याचे रिजीजू म्हणाले. केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणं आणि भौगोलिक वैशिष्ट्ये आता सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशात त्यांच्या प्रमाणित नावांनी ओळखण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणांवर चीनचा दावा आणि त्यांची नावं वारंवार बदल करण्याच्या चीनच्या कृतीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि चीनने दोन्ही देशातील संबंध टिकवण्यासाठी नियंत्रण रेषेवर सहकार्य आणि शांतता ठेवणे आवश्यक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Follow Us
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी