AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं गाव जिथे बायको भाड्यानं भेटते; फक्त 10 रुपयात करार

आपण आता 21 व्या शतकात आहोत, मात्र अजूनही काही अशा विचित्र प्रथा परंपरा आहेत, ज्यांनी आपली पाठ सोडलेली नाहीये. अशाच एका प्रथेचा भाग असल्यानं या गावात चक्क बायकांवर बोली लागते.

भारतातील असं गाव जिथे बायको भाड्यानं भेटते; फक्त 10 रुपयात करार
| Updated on: Jan 03, 2025 | 4:11 PM
Share

तुम्हाला जर कोणी सांगितलं की एखाद्या गावात बायको भाड्यानं मिळते तर? तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र भारतामध्ये असं देखील एक गाव आहे, ज्या गावात तुम्हाला बायको भाड्यानं मिळू शकते. या गावात जाऊन तुम्ही काही दिवसांपासून ते एक वर्षासाठी बायको भाड्यानं घेऊ शकतात. एक वर्षानंतर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं करार करावा लागतो.  असं कोणत गाव आहे? हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असणार, यात नवल नाही चला तर जाणून घेऊयात या अनोख्या गावाबद्दल.

21 व्या शतकातही काही प्रथा परंपरांनी आपली पाठ सोडलेली नाहीये. अशाच एका प्रथेमुळे या गावात बायकांवर बोली लागते. इथे बायका भाड्यानं मिळतात, त्यासाठी तुम्हाला करार करावा लागतो. तुम्हाला काही दिवस ते एक वर्षापर्यंत बायको भाड्यानं मिळू शकते, इथे अविवाहित तरुणींसोबत विवाहित बायकांवर देखील बोली लागते. त्यासाठी तुम्हाला दहा रुपये किंवा शंभर रुपयांच्या बाँण्डवर करार करावा लागतो.

शिवपुरी असं या गावाचं नाव आहे, हे गाव भारताच्या मध्य प्रदेश राज्यात येते. इथे फक्त अविवाहित तरुणीच नाही तर विवाहित बायका देखील भाड्यानं मिळतात. त्यासाठी तुम्हाला दहा रुपये किंवा 100 रुपयांच्या स्टँम्प पेपरवर करार करावा लागतो. त्यामध्ये तुम्ही संबंधित महिलेला किती दिवस भाड्यानं घेऊन जाणार आहात याचा उल्लेख असतो. महिला दिसायला किती सुंदर आहे, त्यावरून तिची वर्षभराची किंमत ठरवली जाते.

अशी ठरवली जाते महिलांची किंमत? 

इथे महिलेवर पंधरा हजार रुपयांपासून बोली लावली जाते. ते पंधरा लाखांपर्यंत. त्यानंतर वर्षभराचा करार केला जातो. मात्र वर्षभरानंतरही तुम्हाला जर पुन्हा या महिलेसोबतच करार करायचा असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा नवी बोली लावावी लागते. तसेच वाढीव किंमत देखील मोजावी लागते. या प्रथेला धडीचा प्रथा असं म्हटलं जातं.

ज्या महिलांना एक वर्षाच्या भाडे करारावर घेतलं जातं अशा महिलांना पुरुष वेगवेगळ्या कामाला लावतात. काही जण तर घर काम करण्यासाठी अशा महिलांना करार पद्धतीवर भाड्यानं घेतात. तर ज्या पुरुषांचं लग्न झालं नाही, असे पुरुष त्यांच्या आयुष्यात कोणतरी मौत्रिण असावी म्हणून अशा करारामध्ये सहभागी होतात.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...