AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगाल धुमसलं, वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर, हिंसेत तिघांचा मृत्यू

या सर्व घडामोडी घडत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

पश्चिम बंगाल धुमसलं, वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर, हिंसेत तिघांचा मृत्यू
west bengal violence
| Updated on: Apr 12, 2025 | 9:41 PM
Share

West Bengal Violence : विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे. येथे ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. राज्यातील मिर्शिदाबाद येथील शमशेरगंज या भागात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले यात एकूण तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शुक्रवारीदेखील मुर्शिदाबाद येथे वक्फ कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये एकूण 118 लोकांना अटक करण्यात आले आहे.

वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी समशेरगंज येथील जाफराबाद या भागात लोक वफ्क कायद्याला विरोध करण्यासाठी एकत्र जमले होते. मात्र यादरम्यान, मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यादरम्यानच एका गावावर हल्ला करण्यात आला. यात एकाच कुटुंबातील पिता-पुत्राची हत्या करण्यात आली.

पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

शुक्रवारीही मुर्शिदाबाद येथे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले होते. या लोकांकडून वक्फ कायद्याला विरोध करण्यात आला होता. आंदोलनकर्ते वक्फ कायद्याविरोधात घोषणाबाजी करत होते. आंदोलनादरम्यान समशेरगंज याच परिसरात असणाऱ्या धुलियम भागातील राष्ट्रीय महामार्ग-12 अडवून धरला. मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती. यात एकूण 10 पोलीस अधिकारी जखमी झाले होते.

शनिवारी हीच हिंसा धुलियान या भागापर्यंत वाढली. या भागात एका व्यक्तीला गोळी लागल्याची माहिती मिळते आहे. स्थितीवर नियंत्रण मिळवता यावे म्हणून पोलीस लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या?

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. “ज्या कायद्यामुळे लोकांत नाराजी आहे, तो कायदा आम्ही बनवलेला नाही. हा केंद्र सरकारने तयार केलेला कायदा आहे. मी याआधीच स्पष्ट केलेलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही. मग हा हिंसाचार कशासाठी केला जातोय,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय.

ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेनंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. आम्ही सत्तेत आल्यास अशा प्रकारच्या गुंडगिरीली आणि हिंसाचाराला आम्ही पाच मिनिटांत मिटवू, असे पश्चिम बंगालचे भाजपा अद्यक्ष सुकांत मुजुमदार म्हणाले आहेत.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात