पाकिस्तानला जाणारं पाणी यमुनेत वळवणार, गडकरींचं जालीम अस्त्र

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister of Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development & Ganga Rejuvenation) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. भारताच्या हक्काच्या तीन नद्यांचं पाणी आता पाकिस्तानला जाऊ देणार नसल्याचं ते म्हणाले. तीन प्रकल्प तयार करुन हे पाणी यमुना नदीत नेलं जाईल. इटावा, दिल्ली आणि आग्रापर्यंत जलमार्गाचा आराखडाही […]

पाकिस्तानला जाणारं पाणी यमुनेत वळवणार, गडकरींचं जालीम अस्त्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister of Road Transport & Highways, Shipping and Water Resources, River Development & Ganga Rejuvenation) यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. भारताच्या हक्काच्या तीन नद्यांचं पाणी आता पाकिस्तानला जाऊ देणार नसल्याचं ते म्हणाले. तीन प्रकल्प तयार करुन हे पाणी यमुना नदीत नेलं जाईल. इटावा, दिल्ली आणि आग्रापर्यंत जलमार्गाचा आराखडाही तयार आहे. बागपतमध्ये रिव्हर पोर्ट तयार केलं जाईल, असंही गडकरींनी सांगितलं. शिवाय शेतकऱ्यांनी पीकचक्र बदललं आणि ऊसापासून इथेनॉल निर्मिती केली तर रोजगार आणि उत्पन्न दोन्हींमध्ये वाढ होईल, असं गडकरी म्हणाले.

उत्तर प्रदेशातील एका प्रकल्पाचा शुभारंभ करताना गडकरींनी ही घोषणा केली. रस्त्यांसोबतच जलमार्ग तयार करण्यावरही सरकारकडून काम सुरु असल्याची माहिती गडकरींनी दिली. भारताच्या अधिकारात असलेल्या तीन नद्यांचं पाणी यमुनेत आणलं जाईल. हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशाचे लोक दिल्लीहून आग्राला जलमार्गाने जाऊ शकतील, असा दावाही गडकरींनी केला.

वाचाना युद्ध, ना लढाई, हे शस्त्र वापरून पाकिस्तानला गुडघे टेकायला लावा

रिव्हर पोर्टही बागपतमध्ये यमुनेच्या किनाऱ्यावर बनवण्याचा विचार असल्याचं गडकरींनी सांगितलं. यामुळे साखर बांगलादेश आणि म्यानमारपर्यंत पाठवली जाईल, ज्यामुळे खर्चातही बचत होईल. प्रयागराजपासून वाराणसीपर्यंत जलमार्ग तयार आहे. लवकरच यामध्ये बोटी चालवल्या जातील. एका बोटीतून 14 जण एकाच वेळी जाऊ शकतात. गंगेसोबतच यमुना, हिंडन आणि कालीसह इतर नद्या आणि नाल्यांचं पाणीही नमामी गंगे मिशनअंतर्गत स्वच्छ केलं जाईल, असं गडकरी म्हणाले.

यमुनेत पाणी वळवणं खरंच शक्य आहे का?

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी कराचीत या करारावर स्वाक्षरी केली होती. जागतिक बँकेने या करारासाठी मध्यस्थी केलेली आहे. या करारानुसार, सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले. सतलज, व्यास आणि रावी या नद्या पूर्व खोऱ्यात, तर सिंधू, झेलम, चिनाब या नद्या पश्चिम खोऱ्यात येतात. पूर्व खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी हवं तितकं वापरण्याचा अधिकार भारताला आहे. पश्चिम खोऱ्यातल्या पाण्यावर काही बंधनं आहेत. कारण, पश्चिम खोऱ्यातलं पाणी पाकिस्तानला जातं.

भारताने पाकिस्तानसोबत पाण्यासाठी आतापर्यंत कधीही वाद घातला नाही. कारण, प्रश्न पाण्याचा आहे. उदारपणा दाखवत भारताने मोठ्या मनाने पाकिस्तानला पाणी दिलं. आपण बांगलादेशलाही पाणी देतो. पण ज्या देशाचं पाणी आपण पितो त्याच देशाविरुद्ध दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला पाणी देऊ नये, अशी भूमिका याअगोदर अनेक राज्यकर्त्यांनी आणि अभ्यासकांनी घेतलेली आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.