AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगा विरुद्ध ममता बॅनर्जी आक्रमक, परवानगीशिवाय धरणं आंदोलन सुरु

ममता बॅनर्जी यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही. असं असलं तरी ममता यांनी मात्र आपलं आंदोलन सुरु केलं आहे.

West Bengal Election 2021 : निवडणूक आयोगा विरुद्ध ममता बॅनर्जी आक्रमक, परवानगीशिवाय धरणं आंदोलन सुरु
ममता बॅनर्जी यांचं निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 13, 2021 | 2:44 PM
Share

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. ममता दीदींवर 24 तास प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे. आयोगाच्या या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. ममता बॅनर्जी यांनी मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन सुरु केलंय. दरम्यान, ममता बॅनर्जी यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही. असं असलं तरी ममता यांनी मात्र आपलं आंदोलन सुरु केलं आहे. (Mamata banerjee protest again election commission action)

तृणमूल काँग्रेसने सकाळी पत्र लिहून धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी मागितली होती. मात्र, एवढ्या कमी वेळात आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र, ममता बॅनर्जी यांनी सकाळी 11.30 पासूनच धरणे आंदोलन सुरु केलं आहे.

तृणमूल काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसचे नेते सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजपसाठी निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनले असल्याची घणाघाती टीका तृणमूल काँग्रेसचे नेते करत आहेत. निवडणूक आयोगाने केलेली कारवाई ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि असंविधानिक आहे. निवडणूक आयोग पक्षपाती बनलं आहे. भाजप नेत्यांवर त्यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केलाय.

ममता बॅनर्जींवर 24 तास प्रचारबंदीची कारवाई

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना 24 तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. पुढील 24 तास ममता बॅनर्जी निवडणुकीत प्रचार करु शकणार नाहीत. 12 एप्रिल रात्री 8 पासून ते 13 एप्रिल रात्री 8 पर्यंत ममता बॅनर्जी यांना कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही.

निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करत ममता बॅनर्जी यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही कारवाई केलीय. तसंच निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता बॅनर्जी यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय.

’12 एप्रिल लोकशाहीसाठी काळा दिवस’

निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं तृणमूल काँग्रेसनं म्हटलंय. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी 12 एप्रिल हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हटलंय.

संबंधित बातम्या :

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींवर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, 24 तासांसाठी प्रचारबंदी!

West Bengal Election 2021 : ममता दीदी, राग काढायचा तर माझ्यावर काढा, मला शिव्या घाला – पंतप्रधान मोदी

Mamata banerjee protest again election commission action

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?