AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर शरद पवारांचे खासदार आणि PM मोदींची बैठक संपली; 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा झाली?

शरद पवारांच्या 8 खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली. या भेटीनंतर झालेल्या बैठकीत खासदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मांडले.

अखेर शरद पवारांचे खासदार आणि PM मोदींची बैठक संपली; 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा झाली?
| Updated on: Aug 10, 2026 | 12:31 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणूक जिंकल्यानंतर प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात दोन भेटी झाल्या होत्या. दुसरीकडे आज सोमवारी शरद पवारांचे 8 खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली. राष्ट्रवादीचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 15 मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती समोर आली आहे.

नेमकी काय चर्चा झाली?

शरद पवारांच्या 8 खासदारांनी संसद भवानातील पंतप्रधान कार्यालयात पीएम नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेटीनंतर झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्व खासदार भेटीसाठी पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर शरद पवार यांच्या एनर्जीचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे, अशा शब्दात मोदींनी कौतुक केलं.त्यानंतर सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मतदारसंघातील प्रश्न मांडले.

खासदारांनी कोणते प्रश्न मांडले?

खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या पाण्याचा प्रश्न मांडला. उजनी धरणातून बीड जिल्ह्याला पाणी सोडा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. पीएम केअरमधून खासदारांना 35 प्रकरणांसाठी पैसे मिळतात, त्यांची संख्या वाढवावी. केवळ एका खासदारांसाठी नव्हे, तर सर्व खासदारांसाठी ही वाढ करावी, असा मुद्दा सोनवणे यांनी मांडला.

नवी मुंबईच्या विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी दिल्लीत आंदोलन देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली. नावाविषयी राज्य सरकारने प्रस्ताव मान्य केला आहे. आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार म्हात्रे यांनी केली. नगरचे खासदार निलेश लंके यांनी कर्करोगाविषयीचा मुद्दा हा पंतप्रधान मोदींकडे मांडला. खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मुद्दा मांडला. खासदार अमर काळे यांनीही पंतप्रधान मोदींकडे त्यांच्या मतदारसंघाचा मुद्दा मांडला आहे.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय